शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

धान खरेदीचा निर्णय लवकरच होणार

By admin | Updated: June 11, 2014 00:07 IST

जिल्ह्यातील बंद असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रांचा विषय लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधी लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर

गोंदिया : जिल्ह्यातील बंद असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रांचा विषय लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधी लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर आता आ.गोपालदास अग्रवाल यांनीही विधानसभेत यावर आवाज उठवला. त्यामुळे धान केंद्र लवकरच सुरू होण्याची आशा बळावली आहे.जिल्ह्यात उन्हाळी धानाचे क्षेत्र एकीकडे वाढत असताना ऐन धान खरेदीच्या काळात जिल्ह्यातील शासकीय आधारभूत किमतीनुसार खरेदी होणाऱ्या धानाचे केंद्र बंद करण्यात आले. हे धान खरेदी केंद्र सरकारच्या आदेशाने बंद केल्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारित असल्याचा आरोप भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला होता. यात शेतकऱ्यांचे नाहक मरण होत असल्यामुळे या विषय लवकर मार्गी लावावा अशी मागणी दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधीतून विधिमंडळ सभागृहात केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता आ.अग्रवाल यांनी या विषयाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.सध्या धान खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दर १३०० रुपये असताना व्यापाऱ्यांना नाईलाजाने ९०० ते १००० रुपये क्विंटल अशा दराने धान विकावे लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्यामुळे सध्या शेतकरी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवसात याबाबतचा निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)