शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

धान खरेदीचा निर्णय लवकरच होणार

By admin | Updated: June 11, 2014 00:07 IST

जिल्ह्यातील बंद असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रांचा विषय लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधी लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर

गोंदिया : जिल्ह्यातील बंद असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रांचा विषय लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधी लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर आता आ.गोपालदास अग्रवाल यांनीही विधानसभेत यावर आवाज उठवला. त्यामुळे धान केंद्र लवकरच सुरू होण्याची आशा बळावली आहे.जिल्ह्यात उन्हाळी धानाचे क्षेत्र एकीकडे वाढत असताना ऐन धान खरेदीच्या काळात जिल्ह्यातील शासकीय आधारभूत किमतीनुसार खरेदी होणाऱ्या धानाचे केंद्र बंद करण्यात आले. हे धान खरेदी केंद्र सरकारच्या आदेशाने बंद केल्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारित असल्याचा आरोप भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला होता. यात शेतकऱ्यांचे नाहक मरण होत असल्यामुळे या विषय लवकर मार्गी लावावा अशी मागणी दोन दिवसांपूर्वी आ.डॉ.खुशाल बोपचे यांनी लक्ष्यवेधीतून विधिमंडळ सभागृहात केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता आ.अग्रवाल यांनी या विषयाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.सध्या धान खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दर १३०० रुपये असताना व्यापाऱ्यांना नाईलाजाने ९०० ते १००० रुपये क्विंटल अशा दराने धान विकावे लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्यामुळे सध्या शेतकरी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवसात याबाबतचा निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)