शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आधी मोबदला ठरवा, मगच टॉवर उभारा

By admin | Updated: April 23, 2017 01:46 IST

रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे.

शेतकरी झाले आक्रमक : मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेची टॉवर उभारणी वांद्यात गोंदिया : रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे निश्चित न करताच त्यांच्या शेतजमिनीत टॉवर उभारणी केली जात असल्यामुळे २२ शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रतिटॉवर १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करा, त्यानंतरच काम सुरू करा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आणि वेळप्रसंगी सहकुटुंब आंदोलन करणार, असा इशारा माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे यांच्यासह पीडित शेतकऱ्यांनी शनिवारी दिला. गोंदियात पत्रपरिषदेत याप्रकरणाची माहिती देताना टेंभरे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले की, मुंडीपार ते हिरडामाली यादरम्यान १५ किलोमीटरच्या अंतरात ६४ विद्युत टॉवरची उभारणी केली जात आहे. रेल्वे लाईनसाठी उभारल्या जात असलेल्या या टॉवरची उभारणी करण्याचे काम महापारेषण कंपनीकडे आहे. त्यांनी ते एका कंत्राटदाराला सोपविले आहे. त्या ६४ टॉवरपैकी २२ टॉवर सरकारी जमिनीत आहेत. उर्वरित ४२ टॉवरपैकी २२ टॉवर ज्या २२ शेतकऱ्यांच्या शेतात उभारले जाणार आहे त्यांनी यासंदर्भात योग्य मोबदला देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महापारेषण कंपनी आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी या कामात अडथळा आणू नये असे निर्देश दिले. तसेच टॉवरचे काम होताच एक महिन्याच्या आत रेल्वे विद्युतीकरण विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला द्यावा, असे निर्देश दि.१७ एप्रिलला दिले. या पत्रपरिषदेला संजय टेंभरे यांच्यासह रतन बघेले, तुलाराम बिहारी, देवराव फाये, बुधा भगत, श्यामलाल बघेले, प्रल्हाद हरिणखेडे, ओंकार पारधी, गजानन रहांगडाले, रामकुमार हरिणखेडे, चंदन पंधरे, नानुराम बागडे, लिखेंद्र हरिणखेडे, सुनील टेंभरे, सुनील तुरकर, रोषण बोपचे, दिलीप हरिणखेडे, अनिल हरिणखेडे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) नुकसानभरपाई योग्य असावी एका टॉवरच्या कामात १४ ते १५ डेसीमल जमीन जाते. शिवाय शेतजमिनीत असलेले तेवढ्या जागेवरील पीकही जाते. या टॉवरवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्यामुळे त्याखाली काम करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असते. तरीही योग्य मोबदला मिळाल्यास आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिटॉवर किती मोबदला दिला जाणार, हे आधी स्पष्ट करावे, नंतरच काम सुरू करावे, अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असून तोपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये. अन्यथा सहकुटुंब त्या कामाला विरोध करून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांना दिला.