शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

आधी मोबदला ठरवा, मगच टॉवर उभारा

By admin | Updated: April 23, 2017 01:46 IST

रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे.

शेतकरी झाले आक्रमक : मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेची टॉवर उभारणी वांद्यात गोंदिया : रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे निश्चित न करताच त्यांच्या शेतजमिनीत टॉवर उभारणी केली जात असल्यामुळे २२ शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रतिटॉवर १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करा, त्यानंतरच काम सुरू करा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आणि वेळप्रसंगी सहकुटुंब आंदोलन करणार, असा इशारा माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे यांच्यासह पीडित शेतकऱ्यांनी शनिवारी दिला. गोंदियात पत्रपरिषदेत याप्रकरणाची माहिती देताना टेंभरे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले की, मुंडीपार ते हिरडामाली यादरम्यान १५ किलोमीटरच्या अंतरात ६४ विद्युत टॉवरची उभारणी केली जात आहे. रेल्वे लाईनसाठी उभारल्या जात असलेल्या या टॉवरची उभारणी करण्याचे काम महापारेषण कंपनीकडे आहे. त्यांनी ते एका कंत्राटदाराला सोपविले आहे. त्या ६४ टॉवरपैकी २२ टॉवर सरकारी जमिनीत आहेत. उर्वरित ४२ टॉवरपैकी २२ टॉवर ज्या २२ शेतकऱ्यांच्या शेतात उभारले जाणार आहे त्यांनी यासंदर्भात योग्य मोबदला देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महापारेषण कंपनी आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी या कामात अडथळा आणू नये असे निर्देश दिले. तसेच टॉवरचे काम होताच एक महिन्याच्या आत रेल्वे विद्युतीकरण विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला द्यावा, असे निर्देश दि.१७ एप्रिलला दिले. या पत्रपरिषदेला संजय टेंभरे यांच्यासह रतन बघेले, तुलाराम बिहारी, देवराव फाये, बुधा भगत, श्यामलाल बघेले, प्रल्हाद हरिणखेडे, ओंकार पारधी, गजानन रहांगडाले, रामकुमार हरिणखेडे, चंदन पंधरे, नानुराम बागडे, लिखेंद्र हरिणखेडे, सुनील टेंभरे, सुनील तुरकर, रोषण बोपचे, दिलीप हरिणखेडे, अनिल हरिणखेडे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) नुकसानभरपाई योग्य असावी एका टॉवरच्या कामात १४ ते १५ डेसीमल जमीन जाते. शिवाय शेतजमिनीत असलेले तेवढ्या जागेवरील पीकही जाते. या टॉवरवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्यामुळे त्याखाली काम करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असते. तरीही योग्य मोबदला मिळाल्यास आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिटॉवर किती मोबदला दिला जाणार, हे आधी स्पष्ट करावे, नंतरच काम सुरू करावे, अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असून तोपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये. अन्यथा सहकुटुंब त्या कामाला विरोध करून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांना दिला.