शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

आधी मोबदला ठरवा, मगच टॉवर उभारा

By admin | Updated: April 23, 2017 01:46 IST

रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे.

शेतकरी झाले आक्रमक : मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेची टॉवर उभारणी वांद्यात गोंदिया : रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे निश्चित न करताच त्यांच्या शेतजमिनीत टॉवर उभारणी केली जात असल्यामुळे २२ शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रतिटॉवर १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करा, त्यानंतरच काम सुरू करा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आणि वेळप्रसंगी सहकुटुंब आंदोलन करणार, असा इशारा माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे यांच्यासह पीडित शेतकऱ्यांनी शनिवारी दिला. गोंदियात पत्रपरिषदेत याप्रकरणाची माहिती देताना टेंभरे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले की, मुंडीपार ते हिरडामाली यादरम्यान १५ किलोमीटरच्या अंतरात ६४ विद्युत टॉवरची उभारणी केली जात आहे. रेल्वे लाईनसाठी उभारल्या जात असलेल्या या टॉवरची उभारणी करण्याचे काम महापारेषण कंपनीकडे आहे. त्यांनी ते एका कंत्राटदाराला सोपविले आहे. त्या ६४ टॉवरपैकी २२ टॉवर सरकारी जमिनीत आहेत. उर्वरित ४२ टॉवरपैकी २२ टॉवर ज्या २२ शेतकऱ्यांच्या शेतात उभारले जाणार आहे त्यांनी यासंदर्भात योग्य मोबदला देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महापारेषण कंपनी आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी या कामात अडथळा आणू नये असे निर्देश दिले. तसेच टॉवरचे काम होताच एक महिन्याच्या आत रेल्वे विद्युतीकरण विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला द्यावा, असे निर्देश दि.१७ एप्रिलला दिले. या पत्रपरिषदेला संजय टेंभरे यांच्यासह रतन बघेले, तुलाराम बिहारी, देवराव फाये, बुधा भगत, श्यामलाल बघेले, प्रल्हाद हरिणखेडे, ओंकार पारधी, गजानन रहांगडाले, रामकुमार हरिणखेडे, चंदन पंधरे, नानुराम बागडे, लिखेंद्र हरिणखेडे, सुनील टेंभरे, सुनील तुरकर, रोषण बोपचे, दिलीप हरिणखेडे, अनिल हरिणखेडे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) नुकसानभरपाई योग्य असावी एका टॉवरच्या कामात १४ ते १५ डेसीमल जमीन जाते. शिवाय शेतजमिनीत असलेले तेवढ्या जागेवरील पीकही जाते. या टॉवरवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्यामुळे त्याखाली काम करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असते. तरीही योग्य मोबदला मिळाल्यास आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिटॉवर किती मोबदला दिला जाणार, हे आधी स्पष्ट करावे, नंतरच काम सुरू करावे, अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असून तोपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये. अन्यथा सहकुटुंब त्या कामाला विरोध करून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांना दिला.