शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

शंभरी गाठतोय मृतांचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी म्हणावी लागले. मात्र दुसरी बाजू बघितल्यास दर दिवशी मृतांचा आकडा झपाटयाने वाढत चालला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात कहर : दर दिवशी मृत रूग्णांची आकडेवारी चढतीच

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : जिल्ह्यात रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असल्याने आता सर्वांच्या तोंडाचे पाणी पळू लागले आहे. तर सोबतच रूग्ण बहे होऊन घरी परत जात असल्याने तेवढाच दिलासाही जिल्हावासीयांनी मिळत असल्याचे म्हणता येईल. मात्र रूग्णांची संख्या दरदिवशी चढतीच असल्याने मात्र हे धोकादायक ठरत आहे. रूग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत यात आरोग्य विभागाच्या कार्याची प्रशंसा करण्याची गरज आहे. मात्र रूग्ण मृत्यूची आकडेवारी दर दिवशी वाढत चालली असल्याने मात्र प्रश्नचिन्ह उभा राहतो.जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी म्हणावी लागले. मात्र दुसरी बाजू बघितल्यास दर दिवशी मृतांचा आकडा झपाटयाने वाढत चालला आहे. ही मात्र विचार करण्यास लावणारी बाब आहे. एवढ्या मोठ्या संख्येत रूग्ण मरत असल्याने मात्र आरोग्य यंत्रणा उपचारात दुर्लक्ष करीत असल्याचेही आता जनता बोलत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात वयोवृद्धांसोबतच युवकांचाही समावेश आहे. एकीकडे रूग्ण संख्या दररोज २००-३०० च्या घरात वाढत आहे ही गंभीर बाब आहे. मात्र रूग्ण बरे होऊन घरी परत जात असल्याने कुठेतरी जिल्हावासी दिलासा मानत आहेत. मात्र मृतांची संख्या बघता सर्वांचेच मन सुन्न होत असून धडकी भरणारी ही बाब सर्वांनाच टेन्शन देत आहे. वयोवृद्धांपासून ते युवक अशा ९३ रूग्णांना आतापर्यंत जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आघात कुणीच समजून घेऊन शकत नाही.गंभीर रूग्णांकडे विशेष लक्ष देण्याची गरजजिल्हयातील वाढता मृत्यूदर लक्षात घेत आरोग्य यंत्रणेने गंभीर रूग्णांसाठी विशेष कक्ष तयार करून त्यांना तेथेच ठेवावे. तसेच तज्ज्ञ डॉक्टर्सकडून त्यांच्यावर बारीक पाळत ठेवून उपचार द्यावे असे आता नागरिक बोलू लागले आहेत. डॉक्टरांनी कोरोनासोबतच अन्य आजारांकडे लक्ष देऊन गंभीर रूग्णांचा उपचार करणे गरजेचे असून असे केल्यास डॉक्टरांच्या प्रयत्नांपुढे कोरोना टिकणार नाही यात अनुमात्र शंका नसल्याचेही नागरिक बोलत आहेत.सप्टेंबर महिन्यात ७३ रूग्णांचा मृत्यूसप्टेंबर महिना तसा जिल्हावासीयांसाठी अशुभच ठरल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रूग्ण आढळून आले असतानाच मृतांचा सपाटाही याच महिन्यात सुरू झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यातील २८ तारखेपर्यंत ७३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही २० तारखेला ६ तर २८ तारखेला ५ रूग्णांची सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तर १७ व १८ तारखेला एकही मृत्यू नसल्याने हे २ दिवस अत्यंत शुभ ठरल्याचे दिसते.मरणाऱ्यांची पोकळी कुणीच भरणार नाहीजिल्ह्यात मरण पावलेल्या ७३ रूग्णांची पोकळी ही त्यांच्या कुटुंबीयांनाच समजू शक णार आहे. मरण पावणारा आपल्या मागे भरलेले कुटुंब सोडून जातो. त्यात तो कुटुंबाचा कमावता राहिल्यास अवघे कुटुंबच रस्त्यावर येते. म्हणूनच युवा असो की वृद्ध प्रत्येकच व्यक्ती कुटुंबासाठी महत्वाचा आहे. अशात आरोग्य विभागानेही हीच बाब लक्षात रूग्णांवर उपचार करण्याची गरज आहे. कारण, आज देवाचे अवतार म्हणून अवघे जग डॉक्टरांकडेच बघत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या