शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अभिनयातून घडविले महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरेचे दर्शन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:57 IST

तिरोडा : कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस व संत रविदास यांची जयंती संयुक्तरीत्या मेरिटोरियस ...

तिरोडा : कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस व संत रविदास यांची जयंती संयुक्तरीत्या मेरिटोरियस पब्लिक शाळेत शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवून उपस्थितांची मने वेधून घेतली.

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,’ अशा शब्दांत मराठी भाषेचे वैशिष्ट्ये सांगण्यात आले. महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. त्यामुळे मराठी भाषादिनी संतांचे स्मरण करणे अत्यावश्यक ठरते. ही बाब लक्षात घेऊन मेरिटोरियस पब्लिक शाळेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत दर्शनाच्या सादरीकरणाचा नावीन्यपूर्ण प्रयोग साकारला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्यातील अभिनय कला सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास व कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पूजनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुकेश अग्रवाल होते. प्राचार्य तुषार येरपुडे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य तुषार येरपुडे यांनी, मराठी भाषा हृदयाची भाषा आहे, त्यामुळे तिला विसरून चालणार नाही, असे सांगून जगातील प्रगत देशातही मराठी हा विषय शिकविला जातो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. संस्थाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी मराठी भाषेचे आपल्या जीवनातील महत्त्व, महाराष्ट्राला लाभलेली गौरवशाली संत परंपरा व समाज सुधारणेच्या कार्यात संतांची भूमिका यावर प्रकाश टाकला.

........

सर्व संतांचे दर्शन एकाच मंचावर

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संस्थाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी मराठी भाषा समृद्ध करणारे व माय मराठीचा गोडवा गाणाऱ्या महाराष्ट्रातील गौरवशाली संत परंपरेचे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकाच मंचावर दर्शन घडवून आणण्याची अभिनव कल्पना साकारली. यात विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे परिचय देत महाराष्ट्रातील महान संतांना मंचावर साकारले. यात संतांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत भागवत धर्माचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर ते भागवत धर्माचा कळस असणारे जगद्गुरू संत तुकाराम, आधुनिक संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्त्री संतांचेही दर्शन घडविण्यात आले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या ‘विठ्ठल-रुक्मिणी’ अभिनयाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.