शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर घोंघावतेय पुन्हा दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 22, 2016 00:09 IST

यावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी

पावसाचे प्रमाण कमी : धरण, तलाव यावर्षीही राहणार तहानलेलेच?संतोष बुकावन अर्जुनी-मोरगावयावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी निश्चितपणे दुष्काळाचा सामना करावा लागण्याची बिकट अवस्था दिसत आहे. धान रोप फुटवे अवस्थेत असताना साधारणपणे आॅगस्ट महिन्यात ४३६ मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र त्या तुलनेत ५० टक्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. परंतू हे धरण अर्धेही भरलेले नाही. केवळ ४७.२६ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या तीन वर्षात, म्हमजे ५ सप्टेंबर २०१३ नंतर हे धरण ‘ओव्हरफ्लो’ झालेच नाही. या परिसरातील शेतकरी एकतर निसर्ग किंवा या धरणावर पूर्णपणे अवलंबून आहेत. धरणाची लघुतम पातळी ८१० फूट, उच्चतम ८३८.६० फूट आहे. आजघडीला धरणात ८२७.७० फूट जलसाठा आहे. आगामी काळात खरीपाचे पीक निघण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी सोडावेच लागणार आहे. एका महिन्याला सिंचनासाठी साधारणत धरणातील ५ फूट पाण्याची गरज भासते. आॅक्टोबर महिन्याअखेरपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाखाली पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणी खर्च होईल. ८१५ फूट हा राखीव पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत असतो. याशिवाय या धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची अर्जुनी-मोरगाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यासाठी ३.०७२ दलघमी पाण्याची आवश्यकता असते. आगामी उर्वरीत नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. दरवर्षी जिल्ह्यात १३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस होतो. यावर्षीची स्थिती मात्र दयनीय आहे. धरणाच्या पाण्याने खरीप हंगाम कसाबसा निघेल मात्र रबी हंगाम, उन्हाळी पीक, पिण्याचे पाणी, जनावरे, वन्यप्राण्यांसाठी जलसंकट उद्भवण्याची चिन्हे आहेत. सध्या मान्सूनची मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे शिल्लक आहेत. या नक्षत्रात पावसाचे प्रमाण कमी असते. चित्र व स्वाती या नक्षत्रात अनियमित पाऊस होतो. त्यामुळे यंदाचा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता धूसर आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तिरोडा तालुक्यात पावसाचे प्रमाण ९२.९ टक्के असल्याचे दिसते. तिथे गतवर्षी पेक्षा पाऊस जास्त आहे. सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत केवळ ५८.६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत या तालुक्यात १०९ मिमी कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत सरासरीनुसार ९५६.१ मिमी पाऊस हवा होता. मात्र प्रत्यक्षात ६९० मिमी पडला आहे. म्हणजे तब्बल २६६ मिमी पावसाचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सरासरी गाठता आली. मात्र यावर्षी तशी लक्षणे दिसून येत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात गेल्या १९ दिवसात केवळ ८७.८ मिमी पर्जन्यवृष्टी झाली हे विशेष.