शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

जिल्ह्यावर घोंघावतेय पुन्हा दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 22, 2016 00:09 IST

यावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी

पावसाचे प्रमाण कमी : धरण, तलाव यावर्षीही राहणार तहानलेलेच?संतोष बुकावन अर्जुनी-मोरगावयावर्षी जिल्ह्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. धरण, नदी, नाले, तलावात पाणी नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास यावर्षी निश्चितपणे दुष्काळाचा सामना करावा लागण्याची बिकट अवस्था दिसत आहे. धान रोप फुटवे अवस्थेत असताना साधारणपणे आॅगस्ट महिन्यात ४३६ मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र त्या तुलनेत ५० टक्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. परंतू हे धरण अर्धेही भरलेले नाही. केवळ ४७.२६ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या तीन वर्षात, म्हमजे ५ सप्टेंबर २०१३ नंतर हे धरण ‘ओव्हरफ्लो’ झालेच नाही. या परिसरातील शेतकरी एकतर निसर्ग किंवा या धरणावर पूर्णपणे अवलंबून आहेत. धरणाची लघुतम पातळी ८१० फूट, उच्चतम ८३८.६० फूट आहे. आजघडीला धरणात ८२७.७० फूट जलसाठा आहे. आगामी काळात खरीपाचे पीक निघण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी सोडावेच लागणार आहे. एका महिन्याला सिंचनासाठी साधारणत धरणातील ५ फूट पाण्याची गरज भासते. आॅक्टोबर महिन्याअखेरपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाखाली पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणी खर्च होईल. ८१५ फूट हा राखीव पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत असतो. याशिवाय या धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची अर्जुनी-मोरगाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यासाठी ३.०७२ दलघमी पाण्याची आवश्यकता असते. आगामी उर्वरीत नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. दरवर्षी जिल्ह्यात १३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस होतो. यावर्षीची स्थिती मात्र दयनीय आहे. धरणाच्या पाण्याने खरीप हंगाम कसाबसा निघेल मात्र रबी हंगाम, उन्हाळी पीक, पिण्याचे पाणी, जनावरे, वन्यप्राण्यांसाठी जलसंकट उद्भवण्याची चिन्हे आहेत. सध्या मान्सूनची मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे शिल्लक आहेत. या नक्षत्रात पावसाचे प्रमाण कमी असते. चित्र व स्वाती या नक्षत्रात अनियमित पाऊस होतो. त्यामुळे यंदाचा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता धूसर आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तिरोडा तालुक्यात पावसाचे प्रमाण ९२.९ टक्के असल्याचे दिसते. तिथे गतवर्षी पेक्षा पाऊस जास्त आहे. सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत केवळ ५८.६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत या तालुक्यात १०९ मिमी कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत सरासरीनुसार ९५६.१ मिमी पाऊस हवा होता. मात्र प्रत्यक्षात ६९० मिमी पडला आहे. म्हणजे तब्बल २६६ मिमी पावसाचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सरासरी गाठता आली. मात्र यावर्षी तशी लक्षणे दिसून येत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात गेल्या १९ दिवसात केवळ ८७.८ मिमी पर्जन्यवृष्टी झाली हे विशेष.