शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

घाणीच्या साम्राज्याने वनचौकी धोकादायक

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे.

कुंभारटोली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : साचलेल्या पाण्यातून दुर्गंधीआमगाव : नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे. साचलेले पाणी निळे झाले. पाण्याची दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली पाणी काढण्याकरिता जे उपाय पाहिजे ते करीत नसल्याचे गली शेजारील अनेक नागरिकांनी आरोप केला आहे.आंबेडकर चौकाकडून रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या डाव्या बाजूला अनेकांचे अनेक व्यवसाय सुरू आहेत. मात्र या दुकानाच्या मागे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सदर पाणी निळे झाले आहे. अनेक दुर्गंधी युक्त सामान पाण्यात असल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बस चौकीच्या मागील परिसर जरी शासकीय असला तरी पाण्याचा निकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. सदर परिसर ग्रामपंचायत कुंभारटोली अंतर्गत येत आहे. साचलेले पाणी जाण्यास प्रशस्त मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व रोहयोच्या सहकार्याने ही व्यवस्था होणे गरजेचे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागात कोण अधिकारी किंवा कोण कर्मचारी हे शोधणे कठिण झाले आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र पडलेल्या खड्यांना बुजविण्याकरिता कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. वन चौकीच्या मागे साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येणे सुरू झाले आहे. तेथून देवरी मार्गावर उजव्या बाजूला अनेक अतिक्रमण धारकांचे दुकान आहेत. त्यामागेसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. पडलेला कचरा पाण्याने कुजला असून त्याचीसुद्धा दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली व सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नशील नसल्याने नागरिकांत व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)