शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

सडक अर्जुनी : अवकाळी पावसाने तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून केव्हाही येणाऱ्या अवकाळी ...

सडक अर्जुनी : अवकाळी पावसाने तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून केव्हाही येणाऱ्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांना फटका बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात आले आहे.

गहू, हरभरा, वटाणा, मसूर, मिरची, आदी पिकांचे नुकसान झाले आहे. वडेगाव, डेपो डोंगरगाव, पुतळी, सिंदिपार, गिरोला, कोकणा, शेंडा, जांभळी, चिखली, सौंदड, मोगरा, भुसारीटोला, कोसमतोंडी, पांढरी, गोंगले या परिसरातील गहू, हरभरा पीक काढण्यायोग्य झाला आहे. पण, निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हाती आलेले पीक आता खराब होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सडक अर्जुनी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५५ हजार ४६१ हेक्टर आर क्षेत्र असून, त्यापैकी रब्बी पिकाखाली क्षेत्र ५९०९ हेक्टर आर क्षेत्रात आहे. गहू ५६० हेक्टर आर क्षेत्र आहे. तालुक्यात हरभरा पीक ७६० हेक्टर आर क्षेत्रात आहे.

..................

निसर्गाचा हा असाच प्रकोप पुढे राहिला तर हरभरा, गहू हे हाती आलेले पीक गेल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र दिसत आहे.

- तुकाराम लंजे, प्रगतिशील शेतकरी डेपो, डोंगरगाव.

...................

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची रब्बी पिके आता वाया जात आहे. स्वतःचे शेतातील दोन एकर शेतात लावलेले गहू पीक पावसामुळे शेतातच खराब होत आहे. तालुक्यात पाऊस बऱ्यापैकी आल्यामुळे, आठ दिवस पीक काढता येत नाही.

- गोविंदराव मुनीश्वर, वडेगाव सडक

...............

पावसामुळे रब्बी धान पिकाला फायदा असून, वेलवर्गीय पिके, त्यात टरबूज, डांगरे, कारली पिकांचे नुकसान होत आहे. ही पिके विविध कीड व रोगांना बळी पडत आहे. तालुक्यातील गहू, हरभरा पिकांचे शेतकरी आर्थिक अडचणींत सापडला आहे.

एफ.आर.टी. शहा, प्रगतिशील शेतकरी डव्वा