शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

वन्यप्राण्यांनी केले धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) :  सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा व कोहळीपार शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी  धानाची लागवड केली आहे. शेतीला लागूनच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यामुळे पिकांचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहे. तालुक्यातील कोहळीपार शिवारातील शेतकरी धनलाल मानवटकर, रवींद्र बावनकुळे, कुंडलिक मानवटकर, देवराम मानवटकर, कृष्णा बावनकुळे, संजय बावनकुळे, विजय मानवटकर, विनायक गोस्वामी, सदाराम बावनकुळे, भागवत पंधरे व अन्य शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी रब्बी धानाची लागवड केली होती. धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामात नैसर्गिक संकटामुळे धानाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी खचून न जाता हिम्मत करून शेती केली; पण वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे लेखी निवेदन क्षेत्र सहायक फिरोज खॉ पठाण यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीforest departmentवनविभाग