शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वन्यप्राण्यांनी केले धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) :  सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा व कोहळीपार शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी  धानाची लागवड केली आहे. शेतीला लागूनच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यामुळे पिकांचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहे. तालुक्यातील कोहळीपार शिवारातील शेतकरी धनलाल मानवटकर, रवींद्र बावनकुळे, कुंडलिक मानवटकर, देवराम मानवटकर, कृष्णा बावनकुळे, संजय बावनकुळे, विजय मानवटकर, विनायक गोस्वामी, सदाराम बावनकुळे, भागवत पंधरे व अन्य शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी रब्बी धानाची लागवड केली होती. धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामात नैसर्गिक संकटामुळे धानाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी खचून न जाता हिम्मत करून शेती केली; पण वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे लेखी निवेदन क्षेत्र सहायक फिरोज खॉ पठाण यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीforest departmentवनविभाग