शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 00:20 IST

उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे

बळीराजा चिंताग्रस्त : नुकसानभरपाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे धानपीक खाली पडून धान झडल्यामुळे आणि कापणी झालेल्या धानावर पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या परिसरात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याच्या उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. धान पिकाचे चांगले उत्पन्न आपल्या हाती लागेल आणि बँकाचे कर्ज सहजरित्या फेडता येईल, अशी आशा ठेवून नियोजनात शेतकरी वर्ग असताना वादळ व पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवचनेत शेतकरी वर्ग दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचे धान पीक खाली पडून झडले आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी होवून पीक पावसात ओले झाल्याने योग्य धानाची प्रत हाती लागणार नसल्याने चांगल्या भावात धान विकता येणार नाही. या चिंतेने शेतकरी पार खचून गेले आहेत. यापूर्वी झालेल्या नुकसानीचे शासनाने सर्वेक्षण करुन तुटपुंज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली. धान पिकविण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री बेरात्री शेतावर जावून पिकांची काळजी घेतात. अशावेळी शासनाने योग्य मदत दिली नाही तर शेतकऱ्यांची निराशा होत असते. तरी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.