शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 00:20 IST

उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे

बळीराजा चिंताग्रस्त : नुकसानभरपाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे धानपीक खाली पडून धान झडल्यामुळे आणि कापणी झालेल्या धानावर पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या परिसरात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याच्या उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. धान पिकाचे चांगले उत्पन्न आपल्या हाती लागेल आणि बँकाचे कर्ज सहजरित्या फेडता येईल, अशी आशा ठेवून नियोजनात शेतकरी वर्ग असताना वादळ व पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवचनेत शेतकरी वर्ग दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचे धान पीक खाली पडून झडले आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी होवून पीक पावसात ओले झाल्याने योग्य धानाची प्रत हाती लागणार नसल्याने चांगल्या भावात धान विकता येणार नाही. या चिंतेने शेतकरी पार खचून गेले आहेत. यापूर्वी झालेल्या नुकसानीचे शासनाने सर्वेक्षण करुन तुटपुंज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली. धान पिकविण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री बेरात्री शेतावर जावून पिकांची काळजी घेतात. अशावेळी शासनाने योग्य मदत दिली नाही तर शेतकऱ्यांची निराशा होत असते. तरी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.