शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सततच्या पावसाने नर्सरी व धानपिकांचे नुकसान

By admin | Updated: July 23, 2014 23:42 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात सतत पंधरा दिवसापासून पाऊस पडल्याने तलाव बोड्या ओव्हरफ्लो झाल्या. छोट्या छोट्या नाल्यांना पाण्याची थोप आहे. तलाव काठावरील धानपिक व नाल्यांना लागून असलेल्या शेतीतील धानपिक चार दिवसापासून पाण्याखाली दबून आहेत. त्यामुळे अगोदरच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धानपिक नष्ट झाले आहे.छत्रपाल परतेकी, मनोज मरस्कोल्हे, भागवत पंधरे, प्रल्हाद पंधरे, बिरजलाल परतेकी, चिंताराम मडावी, सदाराम कोडापे, लालचंद गजभिये, सुरेंद्र वाढीवे, विजय बावनकुळे, रविंद्र बावनकुळे, राजेश चाचेरे, कांतीलाल मेश्राम व राजकुमार दहिवले या शेतकऱ्यांचे धानपिकाचे कमी अधिक प्रमाणात लाखो रुपयाचे धानपिक नष्ट झाले आहे.पावसाचा कहर होत आहे. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाव खेड्यातील शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शेतीत राबतो. त्याचप्रमाणे या परिसरात उद्योगधंदे नसल्याने शेतीवर अवलंबून राहून आपला उदरनिर्वाह करतो. बँकेकडून घेतलेले कर्ज व इतरांकडून घेतलेल्या उसनवारीची परतफेड कशी करावी. या विचाराने शेतकरी, चिंतातूर झाला आहे. कृषी विभागातील कर्मचारी व महसूल विभागातील तलाठ्याला शेतीची पाहणी करण्यासाठी वारंवार सुचना देऊनही वेळेवर येत नाही. तर तलाठी कार्यालयाच्या चकरा मारुनही तलाठी कार्यालयात हजर मिळत नाही. अशातच विलंब होऊन शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला जातो, असा सूर शेतकऱ्यांकरवी निघत आहे.प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी एसीत बसून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतात काय? असा सवालही शेतकरी करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी व उदरनिर्वाहासाठी काम देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाळ्याचा दिड महिना लोटल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या मृत्यू पावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. दुबार पेरणी केल्यावर संततधार पावसाने उसंत न दिल्यामुळे टाकलेला धान वाहून गेला. ज्या शेतकऱ्यांनी जेमतेम रोवणी केली त्या शेतकऱ्यजांची रोवणी पाण्यामुळे वाहून गेली. (वार्ताहर)