शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने नर्सरी व धानपिकांचे नुकसान

By admin | Updated: July 23, 2014 23:42 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात सतत पंधरा दिवसापासून पाऊस पडल्याने तलाव बोड्या ओव्हरफ्लो झाल्या. छोट्या छोट्या नाल्यांना पाण्याची थोप आहे. तलाव काठावरील धानपिक व नाल्यांना लागून असलेल्या शेतीतील धानपिक चार दिवसापासून पाण्याखाली दबून आहेत. त्यामुळे अगोदरच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धानपिक नष्ट झाले आहे.छत्रपाल परतेकी, मनोज मरस्कोल्हे, भागवत पंधरे, प्रल्हाद पंधरे, बिरजलाल परतेकी, चिंताराम मडावी, सदाराम कोडापे, लालचंद गजभिये, सुरेंद्र वाढीवे, विजय बावनकुळे, रविंद्र बावनकुळे, राजेश चाचेरे, कांतीलाल मेश्राम व राजकुमार दहिवले या शेतकऱ्यांचे धानपिकाचे कमी अधिक प्रमाणात लाखो रुपयाचे धानपिक नष्ट झाले आहे.पावसाचा कहर होत आहे. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाव खेड्यातील शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शेतीत राबतो. त्याचप्रमाणे या परिसरात उद्योगधंदे नसल्याने शेतीवर अवलंबून राहून आपला उदरनिर्वाह करतो. बँकेकडून घेतलेले कर्ज व इतरांकडून घेतलेल्या उसनवारीची परतफेड कशी करावी. या विचाराने शेतकरी, चिंतातूर झाला आहे. कृषी विभागातील कर्मचारी व महसूल विभागातील तलाठ्याला शेतीची पाहणी करण्यासाठी वारंवार सुचना देऊनही वेळेवर येत नाही. तर तलाठी कार्यालयाच्या चकरा मारुनही तलाठी कार्यालयात हजर मिळत नाही. अशातच विलंब होऊन शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला जातो, असा सूर शेतकऱ्यांकरवी निघत आहे.प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी एसीत बसून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतात काय? असा सवालही शेतकरी करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी व उदरनिर्वाहासाठी काम देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाळ्याचा दिड महिना लोटल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या मृत्यू पावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. दुबार पेरणी केल्यावर संततधार पावसाने उसंत न दिल्यामुळे टाकलेला धान वाहून गेला. ज्या शेतकऱ्यांनी जेमतेम रोवणी केली त्या शेतकऱ्यजांची रोवणी पाण्यामुळे वाहून गेली. (वार्ताहर)