शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अवकाळी पावसाने मिरची पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत ...

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सोमवार, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तोडणी करुन वाळत घातलेली मिरची ओली झाली त्यामुळे मिरची काळी पडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून मिरची तोडणीचा हंगाम सुरु आहे. मिरची पिकाची तोडणी केल्यानंतर आठ दिवस उन्हात वाळत घालावी लागते ही प्रक्रिया सुरु असतानाच अवकाळी पावसाने वाळत घातलेली मिरची ओली झाली आहे. ओली झालेली मिरची चांगल्या प्रतीची राहत नाही त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शासन मिरची पिकासाठी हमीभाव जाहीर करीत नाही त्यामुळे मिरची पिकाला बाजारभाव मिळत नाही. वास्तविक शेतकऱ्यांनी उत्पादित प्रत्येक पिकासाठी हमीभाव देणे आवश्यक असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने मिरची उत्पादक शेतकरी नाडला जात आहे.

.....

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

लागवड खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची लागवड क्षेत्र कमी करुन इतर पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावून मिरची पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अगोदरच एक वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटांना शेतकरी वैतागला आहे. मंजूर वर्ग मिळत नाही. या सर्व अडचणींचा विचार करुन केंद्र शासनाने मिरची उत्पन्नाकरिता हमीभाव जाहीर करण्याची मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

...............

हमीभाव केंद्र सुरु करा

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरची राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र मिरची खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.