शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

अवकाळी पावसाने मिरची पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत ...

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सोमवार, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तोडणी करुन वाळत घातलेली मिरची ओली झाली त्यामुळे मिरची काळी पडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून मिरची तोडणीचा हंगाम सुरु आहे. मिरची पिकाची तोडणी केल्यानंतर आठ दिवस उन्हात वाळत घालावी लागते ही प्रक्रिया सुरु असतानाच अवकाळी पावसाने वाळत घातलेली मिरची ओली झाली आहे. ओली झालेली मिरची चांगल्या प्रतीची राहत नाही त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शासन मिरची पिकासाठी हमीभाव जाहीर करीत नाही त्यामुळे मिरची पिकाला बाजारभाव मिळत नाही. वास्तविक शेतकऱ्यांनी उत्पादित प्रत्येक पिकासाठी हमीभाव देणे आवश्यक असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने मिरची उत्पादक शेतकरी नाडला जात आहे.

.....

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

लागवड खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची लागवड क्षेत्र कमी करुन इतर पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावून मिरची पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अगोदरच एक वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटांना शेतकरी वैतागला आहे. मंजूर वर्ग मिळत नाही. या सर्व अडचणींचा विचार करुन केंद्र शासनाने मिरची उत्पन्नाकरिता हमीभाव जाहीर करण्याची मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

...............

हमीभाव केंद्र सुरु करा

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरची राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र मिरची खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.