शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने मिरची पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत ...

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सोमवार, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तोडणी करुन वाळत घातलेली मिरची ओली झाली त्यामुळे मिरची काळी पडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून मिरची तोडणीचा हंगाम सुरु आहे. मिरची पिकाची तोडणी केल्यानंतर आठ दिवस उन्हात वाळत घालावी लागते ही प्रक्रिया सुरु असतानाच अवकाळी पावसाने वाळत घातलेली मिरची ओली झाली आहे. ओली झालेली मिरची चांगल्या प्रतीची राहत नाही त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शासन मिरची पिकासाठी हमीभाव जाहीर करीत नाही त्यामुळे मिरची पिकाला बाजारभाव मिळत नाही. वास्तविक शेतकऱ्यांनी उत्पादित प्रत्येक पिकासाठी हमीभाव देणे आवश्यक असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने मिरची उत्पादक शेतकरी नाडला जात आहे.

.....

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

लागवड खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची लागवड क्षेत्र कमी करुन इतर पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावून मिरची पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अगोदरच एक वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटांना शेतकरी वैतागला आहे. मंजूर वर्ग मिळत नाही. या सर्व अडचणींचा विचार करुन केंद्र शासनाने मिरची उत्पन्नाकरिता हमीभाव जाहीर करण्याची मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

...............

हमीभाव केंद्र सुरु करा

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरची राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र मिरची खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.