शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने मिरची पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत ...

वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सोमवार, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तोडणी करुन वाळत घातलेली मिरची ओली झाली त्यामुळे मिरची काळी पडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून मिरची तोडणीचा हंगाम सुरु आहे. मिरची पिकाची तोडणी केल्यानंतर आठ दिवस उन्हात वाळत घालावी लागते ही प्रक्रिया सुरु असतानाच अवकाळी पावसाने वाळत घातलेली मिरची ओली झाली आहे. ओली झालेली मिरची चांगल्या प्रतीची राहत नाही त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शासन मिरची पिकासाठी हमीभाव जाहीर करीत नाही त्यामुळे मिरची पिकाला बाजारभाव मिळत नाही. वास्तविक शेतकऱ्यांनी उत्पादित प्रत्येक पिकासाठी हमीभाव देणे आवश्यक असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने मिरची उत्पादक शेतकरी नाडला जात आहे.

.....

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

लागवड खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची लागवड क्षेत्र कमी करुन इतर पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावून मिरची पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अगोदरच एक वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटांना शेतकरी वैतागला आहे. मंजूर वर्ग मिळत नाही. या सर्व अडचणींचा विचार करुन केंद्र शासनाने मिरची उत्पन्नाकरिता हमीभाव जाहीर करण्याची मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

...............

हमीभाव केंद्र सुरु करा

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरची राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र मिरची खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.