शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:16 IST

नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.

ठळक मुद्देसेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आक्रमक : कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची सक्ती न करता तो ऐच्छिक करण्यात यावा. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा शुक्रवारपासून (दि.१३) आंदोलन छेडण्याचा इशारा सडक-अर्जुनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांनी दिला आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. बऱ्याच गावांची पैसेवारी देखील कमी आहे. शासनाने तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. सडक अर्जुनी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. पीक कर्जाची उचल करताना शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले आहे. कृषी विभागाकडून सुध्दा शेतकºयांना पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. पीक विमा कंपन्या हंगामादरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्या काढण्याची सक्ती करतात. तर बँकाकडून जबरदस्तीने पीक विम्याची रक्कम कर्जातून कपात केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. शासनाने पीक विम्याची सक्ती न करता ते ऐच्छिक करावे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची गरज वाटेल ते काढतील. मात्र इतर शेतकऱ्यांना त्याची सक्ती करु नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी दिला आहे.कर्जमाफीची रक्कम केव्हा देणारराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार सडक-अर्जुनी तालुक्यातील नियमित व थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे कजर् वसुली करताना सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत पैसे जमा करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्षांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आंदोलनाचा इशाराधान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्याचा निर्णय त्वरीत न घेतल्यास सेवा सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या नेतृत्वात सरकार व विम्या कंपन्याच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, मीताराम देशमुख, जागेश्वर धनभाते, मनोहर काशिवार, ईश्वर कोरे, आकोजी रहेले, तेजराम मुंगलमारे, परसराम सुकारे, के. बी. परशुरामकर, डी.के.राऊत, एन.टी.पारधी, जे.एस.कुरसुंगे, एम.वाय.गायकवाड, डी.एन.गावतुरे, डी.डी.गौतम, धनलाल करचाल, शिवाजी गहाणे, अनिल गुप्ता यांनी दिला आहे.