शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:16 IST

नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.

ठळक मुद्देसेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आक्रमक : कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची सक्ती न करता तो ऐच्छिक करण्यात यावा. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा शुक्रवारपासून (दि.१३) आंदोलन छेडण्याचा इशारा सडक-अर्जुनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांनी दिला आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. बऱ्याच गावांची पैसेवारी देखील कमी आहे. शासनाने तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. सडक अर्जुनी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. पीक कर्जाची उचल करताना शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले आहे. कृषी विभागाकडून सुध्दा शेतकºयांना पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. पीक विमा कंपन्या हंगामादरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्या काढण्याची सक्ती करतात. तर बँकाकडून जबरदस्तीने पीक विम्याची रक्कम कर्जातून कपात केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. शासनाने पीक विम्याची सक्ती न करता ते ऐच्छिक करावे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची गरज वाटेल ते काढतील. मात्र इतर शेतकऱ्यांना त्याची सक्ती करु नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी दिला आहे.कर्जमाफीची रक्कम केव्हा देणारराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार सडक-अर्जुनी तालुक्यातील नियमित व थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे कजर् वसुली करताना सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत पैसे जमा करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्षांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आंदोलनाचा इशाराधान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्याचा निर्णय त्वरीत न घेतल्यास सेवा सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या नेतृत्वात सरकार व विम्या कंपन्याच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, मीताराम देशमुख, जागेश्वर धनभाते, मनोहर काशिवार, ईश्वर कोरे, आकोजी रहेले, तेजराम मुंगलमारे, परसराम सुकारे, के. बी. परशुरामकर, डी.के.राऊत, एन.टी.पारधी, जे.एस.कुरसुंगे, एम.वाय.गायकवाड, डी.एन.गावतुरे, डी.डी.गौतम, धनलाल करचाल, शिवाजी गहाणे, अनिल गुप्ता यांनी दिला आहे.