शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

रिलायंस विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: December 2, 2014 23:08 IST

ट्रक चोरीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा प्रस्ताव सादर करणाऱ्या मालकाला रिलायंस विमा कंपनीकडून प्रक्रिया सुरू असल्याचे वारंवार सांगून टाळाटाळ केली. त्या विमा कंपनीला ग्राहक

गोंदिया : ट्रक चोरीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा प्रस्ताव सादर करणाऱ्या मालकाला रिलायंस विमा कंपनीकडून प्रक्रिया सुरू असल्याचे वारंवार सांगून टाळाटाळ केली. त्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका देवून ट्रक मालकाला दिलासा दिला.गोंदियाच्या फुलचूर रोडवरील लोहसेवा ट्रान्सपोर्ट येथील रहिवासी ताजेंदरसिंग इंदरसिंग छाबडा असे तक्रारकर्त्या ट्रकमालकाचे नाव आहे. त्यांनी १९ आॅगस्ट २०१० ते १८ आॅगस्ट २०११ या कालावधीसाठी रिलायंस जनरल विमा कंपनीकडे सदर ट्रकची विमा पॉलिसी काढली होती. त्यांचा ट्रक ३ जानेवारी २०११ रोजी फुलचूर नाक्यावरून चोरी झाला. त्यांनी त्याच दिवशी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून रिलायंस विमा कंपनीचे एजंट जयेश वटवानी यांना रितसर माहिती दिली. सदर ट्रक चोरीच्या तपासात पोलिसांना अपयश आल्याने त्यांनी आपला अंतिम अहवाल २५ जुलै २०११ रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ अन्वये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे सादर केले. यानंतर पोलीस तपासाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह विमा रक्कम, नुकसानभरपाई व तक्रार खर्च मिळण्यासाठी रिलायंस विमा कंपनीकडे सादर केला. सदर विमा कंपनीने १० मे २०११ व ११ जानेवारी २०१२ रोजी पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली. परंतु ट्रक चोरीच्या पुराव्यासह कागदपत्रे न मिळाल्याने दावा मान्य न केल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले. परंतु तक्रारकर्ते छाबडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून रितसर प्राप्त झालेली कागदपत्रे विमा कंपनीला देवूनही विमा दावा सबळ कारणाअभावी फेटाळणे, ही सेवेतील त्रुटी होय. त्यांनी विमा दाव्या संबंधीचे सर्व कागदपत्रे न्यायमंचात दाखल केली. त्यांच्या वकिलांनी राष्ट्रीय आयोगाच्या ‘धर्मेंद्र गोयल विरूद्ध ओरिएंटल इंशुरंस’ या न्यायनिवाड्याचा आधार घेतला. यात पॉलिसी काढतेवेळी नोंदविलेली किंमत वाहनाचा विमा दावा निकाली काढताना उपयोगात आणले जावे, असे म्हटले आहे. त्यामुळे सदर न्यायनिवाडा या प्रकरणाशी सुसंगत असल्याचे मंचाने जाहीर केले. तसेच विमा कंपनीने पॉलिसी काढताना ट्रकची किंमत १३ लाख रूपये नोंदिविले होते. शिवाय कंपनीने विमा दावा प्रलंबित ठेवून कुठलेही संयुक्तिक कारण न देता फेटाळून सेवेत त्रुटी केल्याचा ग्राहक मंचाने निर्णय दिला.या सर्व प्रकरणाची ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने कारणमिमांसा करून छाबडा यांची तक्रार अंशत: मान्य केली. तसेच रिलायंस जनरल विमा कंपनीने चोरी गेलेल्या ट्रकचे विमा दाव्यापोटी १३ लाख रूपये दरसाल दरशेकडा ८ टक्के व्याजाने १७ फेब्रुवारी २०१४ पासून संपूर्ण रक्कम छाबडा यांना मिळेपर्यंत द्यावे. शिवाय मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत तक्रारकर्ते छाबडा यांना द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने रिलायंस जनरल विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)