शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मिनरल वॉटरच्या नावावर ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:51 IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून ...

रावणवाडी : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकून पैसे लुबाडत आहेत. हा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गोरखधंदा सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बस थांबा हॉटेल्स, पानटपरी इतरत्र पाऊच विक्रेत्याकडून सर्रास बोरवेल्सचा पाणी भरून मिनरल वॉटर म्हणून विक्री केली जात आहे. मात्र या पाण्याची गुणवत्ता कुणीच तपासून पाहात नाही. तालुक्यात मिनरल वॉटरच्या धंद्याला उधान येत आहे. उपलब्ध असलेल्या बोरवेल्सचा पाणी पाऊच बंद करून प्रती पाऊन ३ ते ५ रुपये दराने विकले जाते. या पाऊचमध्ये बंद असलेल्या पाण्यात सूक्ष्मजीव-जंतूची वाढ प्रखरतेने वाढत जाते. त्यामुळे नागरिकाना या पाण्यामुळे अनेक लोकांना असाध्य रोगाना बळी पडावे लागत आहे. मिनरल वॉटर तयार करण्यासाठी क्लोरीन आसैनिक प्लारीन आर्यन पोटॉशियम मॅग्नेशियम या केमिकल्सच्या सह्याने पाण्याची शुध्दता केली जाते. त्यानंतर सुक्ष्मजीव, जंतू त्यात येऊ नये. यासाठी योग्य प्रकारे खबरदारी घेत त्याची पॅकींग केली जाते. परंतु बाजारात विक्रीस आलेल्या पाणी पाऊच हे कुठल्याही शासनमान्य कंपन्याचे नूसन हे अवैधरित्या बाजारातील बसस्टॉपवर पान टपरी हॉटेल्स रेल्वे स्टेशनवर विकले जाते. मात्र यावर अन्न व औषध प्रशासन विभाग कुठलीही कारवाई करत नाही. मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यावर याच प्रशासनाचे आशिर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे.