शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

यंदा टार्गेट टॉप-५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:26 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन-२०१८ : त्रुट्यांच्या दुरूस्तीसाठी आले मार्गदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे. नगर परिषदेने केलेल्या कामांची सर्वेक्षणानुरूप तंतोतंत तयारी करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. असे करून नगर परिषदेला टॉप- ५० मध्ये आणण्याचा त्यांचा उद्देश आहे.आपला देश व प्रत्येक शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. यांतर्गत नगर परिषदांना मिशन अंतर्गत आखून देण्यात आलेल्या कामांची पूर्तता करायची आहे. त्यावरच त्यावरून शहरांची रँकींग केली जाणार आहे. आता स्वच्छ भारत मिशन-२०१८ ला सुरूवात झाली असून त्या दृष्टीने नगर परिषदा कामाला लागल्या आहे. त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे. या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करण्यासाठी मध्यंतरी राज्यस्तरीय समितीच्या दोन सदस्यांनी येथे येऊन नगर परिषद स्वच्छता विभागाला मार्गदर्शन केले होते. मात्र एवढ्यावरच अवलंबून राहणे उचीत नसल्यामुळे नगर परिषद स्वच्छता विभागाने केलेल्या कामांची पाहणी करून त्यात असलेल्या त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी व ही सर्व कामे आटोपून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असलेल्या केंद्रीय समितीच्या सर्वेक्षणापुर्वी मिशनच्या आराखड्यानुसार सर्व कामे व कागदपत्र तयार ठेवण्यासाठी दिल्ली येथून राहूल शर्मा नामक परिक्षक-मार्गदर्शक येथील नगर परिषदेत आले आहेत. राज्य शासनाच्या मागणीवरून भारतीय गुणवत्ता नियंत्रण आयोगाकडून त्यांना पाठविण्यात आले आहे. केंद्रीय समितीच्या आगमनापर्यंत ते येथे राहणार असून नगर परिषदेच्या सर्व कागदपत्र व केलेल्या कामांची पाहणी करून त्यांना आराखड्यात तंतोतंत बसविण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे.गोंदियाचा ३४३ वा क्रमांकस्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील वर्षी अवघ्या महाराष्ट्रालाच गालबोट लागले होते. यात गोंदियाचा ३४३ वा क्रमांक होता. यातून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत चालतो याची प्रचिती आली होती. आता स्वच्छ भारत मिशन- २०१८ सुरू झाले आहे. यात तरी माघारलेल्या या शहरांचा क्रमांक उंचावा व शहरांची स्थिती सुधारावी यासाठी राज्य शासनाकडून परीक्षक-मार्गदर्शक पाठवून स्वच्छता विभागाने केलेल्या कामांतील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी ही सर्व धडपड सुरू असल्याचे दिसते. अशात यंदा नगर परिषद काय नेमके काय साध्य करते याकडे लक्ष लागले आहे.