शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लागवड उसाची सातबारावर नोंद धानाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी करते. शासकीय धान खरेदी केंद्रावर केवळ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आधारकार्ड सादर करावे लागते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी। शासकीय धान खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ, जिल्हाधिकारी दखल घेणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ उडाला होता. त्यामुळे तोच गोंधळ पुन्हा यावर्षी होऊ नये,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही उपाययोजना केल्या. मात्र यानंतरही सावळा गोंधळ थांबला नसून चक्क शेतकऱ्याच्या नावावर व्यापाºयांच्या धानाची खरेदी केली जात आहे. तर यासाठी सातबारावर सुध्दा खोडतोड केली जात असून ज्या शेतकºयांने ऊसाची लागवड केली त्याच्या सातबारावर ऊस लागवड केल्याची नोंद केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी करते. शासकीय धान खरेदी केंद्रावर केवळ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आधारकार्ड सादर करावे लागते.ही अट लावण्यामागे शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी केंद्रावर खरेदी केली जाऊ नये हाच उद्देश आहे. मागीलवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर बराच सावळा गोंधळ उडाला होता.त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी काही उपाय योजना केल्या.मात्र यानंतरही घोळ कायम असल्याने या उपाययोजना केवळ कागदा पुरत्याच मर्यादित असल्याचे चित्र आहे. सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव,गोंदिया तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात यंदा ८०० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली. त्यामुळे या शेतकºयांच्या सातबारावर ऊस लागवड अशी नोंद असण्याची गरज आहे. मात्र काही व्यापारी आपल्या धानाची खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना आमीष दाखवून त्यांच्याकडून सातबारा घेत असल्याची माहिती आहे. तर तलाठ्याशी साठगाठ करुन सातबारावर ऊस लागवडी ऐवजी धान लागवड अशी नोंद करुन घेत आहेत. हा प्रकार सर्वाधिक सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुरु आहे.यासंदर्भात आता काही शेतकºयांचीच ओरड वाढली आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्याच्या सातबाराचा आधार घेऊन व्यापारी याचा फायदा घेत असल्याने हा शेतकºयांवर अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया सुध्दा काही शेतकºयांनी व्यक्त केल्या.त्यामुळे जिल्हाधिकारी या सर्व प्रकाराची दखल घेऊन चौकशी करुन दोषी अधिकारी आणि कर्मचाºयावर कारवाई करणार असा सवाल सुध्दा उपस्थित केला जात आहे.अनागोंदी कारभार कायममागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर जो अनागोंदी कारभार झाला होता तोच यंदा सुध्दा कायम आहे. काही व्यापारी आणि राईस मिल चालकांनी स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावावर सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या आहे.त्यामुळे त्यांनी खरेदी केलेला धान सहजपणे खरेदी केंद्रावर विकत असल्याचे चित्र काही केंद्रावर आहे.खरेदी केंद्रात समाविष्ट गावांचा घोळ कायमजिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा जिल्ह्यात ६२ शासकीय धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. प्रत्येक केंद्रातंर्गत विशिष्ट गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र गावांचा समावेश करीत असताना प्रशासनाने नेमका कुठला निकष लावला हे समजायला मार्ग नाही. केंद्राजवळ असलेल्या गावाचा समावेश त्या केंद्रात न करता दूरवर केल्याने याचा शेतकºयांना फटका बसत आहे.

टॅग्स :agricultureशेती