शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

पाण्यासाठी ओरड; ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत

By कपिल केकत | Updated: July 24, 2023 19:48 IST

चालविता येतो फक्त एकच पंप : यामुळेच दोन वेळचा पाणीपुरवठा विस्कळीत

गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहर; तसेच लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला पाणीपुरवठा केला जातो; मात्र डांगोरली येथील पंप हाऊस ‘लो व्होल्टेज’ असल्यामुळे एकच पंप चालविता येत आहे. याचा फटका मात्र पाणीपुरवठ्याला बसत असून, दोनऐवजी फक्त एकच वेळी पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी शहरवासीयांची पाण्यासाठी ओरड सुरू असून त्याला ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत आहे.

गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रकडे सुमारे २४००० कनेक्शनधारक आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी गोंदिया शहरात ५, तर ग्राम कुडवा येथे १ व कटंगी येथेही १ पाणी टाकी असून, दिवसाला १५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. डांगोरली येथील पंप हाऊसमधून शहर व कुडवा आणि कटंगीला पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी डांगोरली पंप हाऊसमध्ये दोन पंप लावण्यात आले आहेत. हे दोन पंप नियमित सुरू राहिल्यास या ७ टाक्यांना पाणीपुरवठा करून भरता येते; मात्र मागील महिनाभरापासून डांगोरली पंप हाऊसला कमी वीज दाब येत असल्यामुळे फक्त एकच पंप चालवावा लागत आहे. यामुळे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत.

परिणामी शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून नाइलाजास्तव फक्त एकच वेळ पाणीपुरवठा करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाची समस्या सोडविण्यात आली तर पंप हाऊसमधील दोन्ही पंप चालवून पाण्याच्या टाक्या भरता येतील. यानंतर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करता येईल. यासाठी मजिप्राकडून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रही देण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून कमी वीज दाबाच्या या समस्येवर काहीच तोडगा काढून समाधान करण्यात आले नाही. परिणामी एक वेळच पाणीपुरवठा केला जात असून, पाण्यासाठी शहरवासीयांच्या ओरडला कमी वीज दाब करणीभूत आहे.

रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सला फटका

कमी वीज दाबामुळे पंप हाऊसमधील फक्त एकच पंप सुरू करता येत आहे; मात्र एका पंपद्वारे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत. परिणामी एकच वेळ पाणीपुरवठा सुरू असून त्यातही याचा सर्वाधिक फटका रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सवासीयांना बसत आहे. या परिसरांमध्ये एकच वेळ पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

४००-४३० व्होल्ट वीज दाबाची मागणी- मजिप्राने घेतलेल्या नोंदीनुसार, १२ जुलैपासून पंप हाऊसला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ३७०-४०० व्होल्ट वीज दाब मिळत आहे. तर पंप हाऊसमध्ये २४० एचपीचे ३ पंप सेट बसविण्यात आले आहेत. अशात दोन पंप सुरू केल्यास वीज दाब कमी होऊन ३८० व्होल्टपर्यंत येतो. परिणामी दोन पंप चालविणे शक्य होत नाही. एकच पंप सुरू असल्याने टाक्या भरत नाही. पाणीपुरवठा फक्त एकच वेळ करावा लागत आहे. अशात ४०० ते ४३० व्होल्टपर्यंत वीज दाब पुरवठा करण्याची मागणी मजिप्राने महावितरणकडे केली आहे. यासाठी १३ जुलै रोजी निवेदन देऊनही समस्या सुटलेली नाही.