शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ओरड; ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत

By कपिल केकत | Updated: July 24, 2023 19:48 IST

चालविता येतो फक्त एकच पंप : यामुळेच दोन वेळचा पाणीपुरवठा विस्कळीत

गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहर; तसेच लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला पाणीपुरवठा केला जातो; मात्र डांगोरली येथील पंप हाऊस ‘लो व्होल्टेज’ असल्यामुळे एकच पंप चालविता येत आहे. याचा फटका मात्र पाणीपुरवठ्याला बसत असून, दोनऐवजी फक्त एकच वेळी पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी शहरवासीयांची पाण्यासाठी ओरड सुरू असून त्याला ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत आहे.

गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रकडे सुमारे २४००० कनेक्शनधारक आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी गोंदिया शहरात ५, तर ग्राम कुडवा येथे १ व कटंगी येथेही १ पाणी टाकी असून, दिवसाला १५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. डांगोरली येथील पंप हाऊसमधून शहर व कुडवा आणि कटंगीला पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी डांगोरली पंप हाऊसमध्ये दोन पंप लावण्यात आले आहेत. हे दोन पंप नियमित सुरू राहिल्यास या ७ टाक्यांना पाणीपुरवठा करून भरता येते; मात्र मागील महिनाभरापासून डांगोरली पंप हाऊसला कमी वीज दाब येत असल्यामुळे फक्त एकच पंप चालवावा लागत आहे. यामुळे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत.

परिणामी शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून नाइलाजास्तव फक्त एकच वेळ पाणीपुरवठा करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाची समस्या सोडविण्यात आली तर पंप हाऊसमधील दोन्ही पंप चालवून पाण्याच्या टाक्या भरता येतील. यानंतर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करता येईल. यासाठी मजिप्राकडून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रही देण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून कमी वीज दाबाच्या या समस्येवर काहीच तोडगा काढून समाधान करण्यात आले नाही. परिणामी एक वेळच पाणीपुरवठा केला जात असून, पाण्यासाठी शहरवासीयांच्या ओरडला कमी वीज दाब करणीभूत आहे.

रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सला फटका

कमी वीज दाबामुळे पंप हाऊसमधील फक्त एकच पंप सुरू करता येत आहे; मात्र एका पंपद्वारे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत. परिणामी एकच वेळ पाणीपुरवठा सुरू असून त्यातही याचा सर्वाधिक फटका रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सवासीयांना बसत आहे. या परिसरांमध्ये एकच वेळ पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

४००-४३० व्होल्ट वीज दाबाची मागणी- मजिप्राने घेतलेल्या नोंदीनुसार, १२ जुलैपासून पंप हाऊसला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ३७०-४०० व्होल्ट वीज दाब मिळत आहे. तर पंप हाऊसमध्ये २४० एचपीचे ३ पंप सेट बसविण्यात आले आहेत. अशात दोन पंप सुरू केल्यास वीज दाब कमी होऊन ३८० व्होल्टपर्यंत येतो. परिणामी दोन पंप चालविणे शक्य होत नाही. एकच पंप सुरू असल्याने टाक्या भरत नाही. पाणीपुरवठा फक्त एकच वेळ करावा लागत आहे. अशात ४०० ते ४३० व्होल्टपर्यंत वीज दाब पुरवठा करण्याची मागणी मजिप्राने महावितरणकडे केली आहे. यासाठी १३ जुलै रोजी निवेदन देऊनही समस्या सुटलेली नाही.