शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पाण्यासाठी ओरड; ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत

By कपिल केकत | Updated: July 24, 2023 19:48 IST

चालविता येतो फक्त एकच पंप : यामुळेच दोन वेळचा पाणीपुरवठा विस्कळीत

गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहर; तसेच लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला पाणीपुरवठा केला जातो; मात्र डांगोरली येथील पंप हाऊस ‘लो व्होल्टेज’ असल्यामुळे एकच पंप चालविता येत आहे. याचा फटका मात्र पाणीपुरवठ्याला बसत असून, दोनऐवजी फक्त एकच वेळी पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी शहरवासीयांची पाण्यासाठी ओरड सुरू असून त्याला ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत आहे.

गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रकडे सुमारे २४००० कनेक्शनधारक आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी गोंदिया शहरात ५, तर ग्राम कुडवा येथे १ व कटंगी येथेही १ पाणी टाकी असून, दिवसाला १५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. डांगोरली येथील पंप हाऊसमधून शहर व कुडवा आणि कटंगीला पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी डांगोरली पंप हाऊसमध्ये दोन पंप लावण्यात आले आहेत. हे दोन पंप नियमित सुरू राहिल्यास या ७ टाक्यांना पाणीपुरवठा करून भरता येते; मात्र मागील महिनाभरापासून डांगोरली पंप हाऊसला कमी वीज दाब येत असल्यामुळे फक्त एकच पंप चालवावा लागत आहे. यामुळे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत.

परिणामी शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून नाइलाजास्तव फक्त एकच वेळ पाणीपुरवठा करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाची समस्या सोडविण्यात आली तर पंप हाऊसमधील दोन्ही पंप चालवून पाण्याच्या टाक्या भरता येतील. यानंतर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करता येईल. यासाठी मजिप्राकडून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रही देण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून कमी वीज दाबाच्या या समस्येवर काहीच तोडगा काढून समाधान करण्यात आले नाही. परिणामी एक वेळच पाणीपुरवठा केला जात असून, पाण्यासाठी शहरवासीयांच्या ओरडला कमी वीज दाब करणीभूत आहे.

रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सला फटका

कमी वीज दाबामुळे पंप हाऊसमधील फक्त एकच पंप सुरू करता येत आहे; मात्र एका पंपद्वारे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत. परिणामी एकच वेळ पाणीपुरवठा सुरू असून त्यातही याचा सर्वाधिक फटका रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सवासीयांना बसत आहे. या परिसरांमध्ये एकच वेळ पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

४००-४३० व्होल्ट वीज दाबाची मागणी- मजिप्राने घेतलेल्या नोंदीनुसार, १२ जुलैपासून पंप हाऊसला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ३७०-४०० व्होल्ट वीज दाब मिळत आहे. तर पंप हाऊसमध्ये २४० एचपीचे ३ पंप सेट बसविण्यात आले आहेत. अशात दोन पंप सुरू केल्यास वीज दाब कमी होऊन ३८० व्होल्टपर्यंत येतो. परिणामी दोन पंप चालविणे शक्य होत नाही. एकच पंप सुरू असल्याने टाक्या भरत नाही. पाणीपुरवठा फक्त एकच वेळ करावा लागत आहे. अशात ४०० ते ४३० व्होल्टपर्यंत वीज दाब पुरवठा करण्याची मागणी मजिप्राने महावितरणकडे केली आहे. यासाठी १३ जुलै रोजी निवेदन देऊनही समस्या सुटलेली नाही.