शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

अनलॉक होताच पुन्हा रस्त्यांवर गर्दी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : राज्य सरकारने पाच टप्प्यात सोमवारपासून अनलॉक जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने ...

गोंदिया : राज्य सरकारने पाच टप्प्यात सोमवारपासून अनलॉक जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि ऑक्सिजन बेडची संख्यासुध्दा २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश करत जिल्हा अनलॉक करण्यात आला. मात्र अनलॉक होता सोमवारी पहिल्याच दिवशी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचेसुध्दा उल्लघंन करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट मागील तीन दिवसांपासून १ टक्क्याच्या आतच आहे. त्याच सोमवारपासून (दि.७) जिल्हा अनलॉक करण्यात आला. अनलॉक होताच सोमवारी सकाळपासून ग्राहकांनी शहरातील भाजीबाजार आणि बाजारपेठेत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णपणे प्रादुर्भाव संपला असून, कोरोनाचा कुठलाही धोका नसल्यासारखे नागरिक वावरत हाेते. मोबाइल तसेच इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये तर अक्षरश: नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पूर्णपणे उल्लघंन केले जात होते, तर दुकानदारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि सॅनिटायझर ठेवण्याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले, तर असेच काहीसे चित्र रेस्टारेंटमध्ये पहायला मिळाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. मात्र नागरिकांचा असाच बेजबाबदारपणा कायम राहिल्यास कोराेनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल झाले आहेत, मात्र कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

..............

पालिकेच्या पथक झाले गायब

सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. मात्र प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना नागरिक आणि व्यावसायिकांना केल्या आहे. याचे पालन केेले जाते किवा नाही याची पाहणी करण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे; पण अनलॉकच्या पहिल्याच दिवशी हे पथक गायब झाल्याचे चित्र होते.

..........

वाहतुकीची कोंडी, वाहतूक शिपाई दिसेना

सोमवारी अनलाॅक होताच नागरिकांनी सकाळपासून शहरातील गोरेलाल चाैक, दुर्गा चौक, नेहरू चौक, चांदणी चौक आणि गांधी प्रतिमा परिसरात गर्दी केली होती. त्यातच दुचाकी आणि चार चाकी वाहनांची भर पडल्याने वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झाली होती. दर पाच मिनिटाला वाहतूक जाम होत होती; पण वाहतूक नियंत्रण पोलीस शिपायांचा कुठेच पत्ता नव्हता.

.........

चेहऱ्यावरील मास्क झाले गायब

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने प्रशासनाने जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक केला आहे. पण हे करतानाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत मास्क लावणे टाळल्याचे चित्र होते.

.........

नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे पुन्हा कोरोनाला निमंत्रणच

जिल्हा अनलॉक झाला म्हणजे कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे कमी झाला असा नव्हे, तर धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी जेवढी काळजी आधी घेतली तेवढीच पुन्हा घेण्याची गरज आहे. अन्यथा, आपले दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे नियमांचे पालन करुन स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.