शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच पुन्हा रस्त्यांवर गर्दी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : राज्य सरकारने पाच टप्प्यात सोमवारपासून अनलॉक जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने ...

गोंदिया : राज्य सरकारने पाच टप्प्यात सोमवारपासून अनलॉक जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि ऑक्सिजन बेडची संख्यासुध्दा २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश करत जिल्हा अनलॉक करण्यात आला. मात्र अनलॉक होता सोमवारी पहिल्याच दिवशी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचेसुध्दा उल्लघंन करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट मागील तीन दिवसांपासून १ टक्क्याच्या आतच आहे. त्याच सोमवारपासून (दि.७) जिल्हा अनलॉक करण्यात आला. अनलॉक होताच सोमवारी सकाळपासून ग्राहकांनी शहरातील भाजीबाजार आणि बाजारपेठेत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णपणे प्रादुर्भाव संपला असून, कोरोनाचा कुठलाही धोका नसल्यासारखे नागरिक वावरत हाेते. मोबाइल तसेच इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये तर अक्षरश: नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पूर्णपणे उल्लघंन केले जात होते, तर दुकानदारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि सॅनिटायझर ठेवण्याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले, तर असेच काहीसे चित्र रेस्टारेंटमध्ये पहायला मिळाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. मात्र नागरिकांचा असाच बेजबाबदारपणा कायम राहिल्यास कोराेनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल झाले आहेत, मात्र कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

..............

पालिकेच्या पथक झाले गायब

सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. मात्र प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना नागरिक आणि व्यावसायिकांना केल्या आहे. याचे पालन केेले जाते किवा नाही याची पाहणी करण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे; पण अनलॉकच्या पहिल्याच दिवशी हे पथक गायब झाल्याचे चित्र होते.

..........

वाहतुकीची कोंडी, वाहतूक शिपाई दिसेना

सोमवारी अनलाॅक होताच नागरिकांनी सकाळपासून शहरातील गोरेलाल चाैक, दुर्गा चौक, नेहरू चौक, चांदणी चौक आणि गांधी प्रतिमा परिसरात गर्दी केली होती. त्यातच दुचाकी आणि चार चाकी वाहनांची भर पडल्याने वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झाली होती. दर पाच मिनिटाला वाहतूक जाम होत होती; पण वाहतूक नियंत्रण पोलीस शिपायांचा कुठेच पत्ता नव्हता.

.........

चेहऱ्यावरील मास्क झाले गायब

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने प्रशासनाने जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक केला आहे. पण हे करतानाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत मास्क लावणे टाळल्याचे चित्र होते.

.........

नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे पुन्हा कोरोनाला निमंत्रणच

जिल्हा अनलॉक झाला म्हणजे कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे कमी झाला असा नव्हे, तर धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी जेवढी काळजी आधी घेतली तेवढीच पुन्हा घेण्याची गरज आहे. अन्यथा, आपले दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे नियमांचे पालन करुन स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.