शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

१८ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:13 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे. अद्याप पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. तर दुसरीकडे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : १०८ कोटींचे उद्दिष्ट, ५९ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे. अद्याप पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. तर दुसरीकडे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने आघाडी घेतली असून राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या आहेत. जिल्हा बँकेने आत्तापर्यंत १८ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र कर्जमाफीचा लाभ अद्यापही जिल्ह्यातील पूर्ण पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची दहावी यादी अद्यापही बँकाना प्राप्त झाली नसल्याने ४० हजारावर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याने बँका त्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांना सावकार आणि नातेवाईकांपुढे हात पसरावे लागत आहे. तर शासन आणि प्रशासन या सर्व प्रकारावर बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे बळीराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे. शासनाने यंदा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकाना खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण ३०६ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १०८ कोटी ११ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी जिल्हा बँकेने आत्तापर्यंत १८ हजार सभासद शेतकऱ्यांना ५९ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वाटपात फार माघारल्या असून त्यांनी आत्तापर्यंत केवळ ४ ते ५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.सातबारा मिळण्यास अडचणबँकेतून पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन सातबारा जोडवा लागतो. शासनातर्फे सध्या सातबारा आॅनलाईन उपलब्ध करुन दिले जात आहे. मात्र मागील दहा ते बारा दिवसांपासून लिंक फेल असल्याने आॅनलाईन सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. तर काही तलाठी सुध्दा शेतकऱ्यांना सातबारा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पीक कर्जाची उचल करण्यास शेतकऱ्यांना अडचण जात आहे.

टॅग्स :agricultureशेती