शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

पीकविमा कंपन्या मालामाल, भरले १६ कोटी, मिळणार ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

गोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा ...

गोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा काढतात. मात्र, मागील दोन वर्षांचा शेतकऱ्यांचा पीक विम्यासंदर्भातील अनुभव पाहता पीक विमा कंपन्या केवळ नावापुरत्याच ठरत आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्तापोटी शेतकऱ्यांनी एकूण १६ कोटी ४८ लाख हजार रुपये भरले. मात्र, विमा कंपनीने केवळ ४३३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी केवळ ६२ लाख रुपये दिले. जवळपास ५२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले. त्यामुळे पीकविमा कंपन्याच मालामाल होत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीसुध्दा मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. विशेष म्हणजे गेल्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात धानपिकांचे नुकसान झाले. याचा अहवाल सुध्दा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला होता. मात्र, यानंतर विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवले ही बाब मात्र समजण्यापलीकडची आहे.

.........

५२ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

मागील वर्षी जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. पीक विम्याच्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख, केंद्र सरकारने ७ कोटी १४ लाख, राज्य सरकारने ७ कोटी १४ लाख असे एकूण १६ काेटी ४८ लाख रुपये भरले होते. मात्र, विमा कंपनीने यापैकी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित ६२ लाख रुपयांचा परतावा दिला. तर तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले. या शेतकऱ्यांना पीक विमा न देण्यामागील कारण मात्र विमा कंपन्यांनी स्पष्ट केले नाही.

.........

विमा भरूनही नुकसान नाही

गेल्या खरीप हंगामात मी माझ्या अडीच हेक्टरमधील धान पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. त्यातच परतीच्या पावसाने नुकसान होऊन देखील विमा कंपनीकडून कुठलीच नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पीक विमा केवळ नावापुरताच ठरत आहे.

- पुरुषोत्तम वानखेडे, शेतकरी

......

मी दरवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढतो. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. विमा कंपनीकडून एकाही वर्षी परतावा मिळाला नाही. हीच परिस्थिती यंदा देखील आहे. त्यामुळे पीक विमा काढायचा की नाही या विचारात मी आहे.

- अविनाश काशिवार, शेतकरी

.....

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पीक विमा काढतात. मात्र, आजवरचा अनुभव पाहता पीक विम्याचा लाभ हा केवळ विमा कंपन्यानाच होत आहे.

- निहारीलाल दमाहे, शेतकरी

...........

खरीप-हंगाम २०-२१

पीक विमाचे एकूण लागवड क्षेत्र : २८९१४

एकूण जमा रक्कम : १६ कोटी ४८ लाख

..................

एकूण मंजूर पीक विमा : ६२ लाख रुपये

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम : २ कोटी २० लाख रुपये

राज्य सरकारने भरलेली पीक विम्याची रक्कम : ७ कोटी १४ लाख

केंद्र सरकारने भरलेली पीक विम्याची रक्कम : ७ कोटी १४ लाख

विमा काढणारे एकूण शेतकरी : ५६६४०

लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या : ४३३३

किती जणांना मिळाला लाभ : ४३३३

किती शेतकऱ्यांना वाटप केली रक्कम : ०