शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

तंटे होणार नाही असे गाव निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:01 IST

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे निर्माण होतात. यासर्व प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहे.

ठळक मुद्दे सत्यपाल महाराज : गोठणगाव येथे प्रबोधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध/गोठणगाव : व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे निर्माण होतात. यासर्व प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे गावकºयांनो गावातून अवैध धंदे बंद करण्याचा आणि व्यसन न करण्याचा संकल्प करा. तंटेच निर्माण होणार नाही असे आदर्श गाव निर्माण करा, असा महत्त्वपूर्ण संदेश प्रसिध्द सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी येथे आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांना दिला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील गोठणगाव येथे सुजल बहुउद्देशिय सामाजिक सेवा समिती नवेगावबांध व तंटामुक्त ग्राम समिती गोठणगाव आणि ग्रामपंचायत गोठणगाव यांच्यातर्फे शुक्रवारी (दि.१९) प्रसिध्द सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रधर्म प्रचारक समिती, गुरूदेव सेवा मंडळाने राष्ट्रसंतांची सामुदाईक प्रार्थना सादर केली. यानंतर बाल व्याख्यानकार संजीवनी कृष्णकांत खोटेले हिचे व्याख्यान झाले. जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, रतिराम राणे, सुशीला हलमारे, योगेशजी नाकाडे, लोकपाल गहाणे, सरपंच जिजाबाई चांदेवार, तंमुस अध्यक्ष नरेंद्र कोळापे, पोलीस पाटील कारुसेना सांगोळे, किशोर तरोणे उपस्थित होते.सत्यपाल महाराज म्हणाले, युवकांनो राजकारणाकडे वळण्यापेक्षा शिक्षण घेऊन चाकरीकडे वळा. माय लेकीनों पुस्तके वाचा, सावित्री जिजाई, भिमाई व रमाई बना, त्याशिवाय शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडणार नाहीत. परंतु शोकांतिका आहे, माय लेकी हो आपण पुस्तके, ग्रामगीता व संविधान वाचत नाही. त्यामुळे समाजाची प्रगती होत नाही. शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रध्दा, भ्रुण हत्त्येवर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटते, त्यामुळे अंधश्रध्दा मानू नका, भ्रुण हत्या करु नका, मुला पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणी प्रमाणे खास करुन माय लेकींनो भ्रुण हत्त्येला विरोध करा. असा संदेश सत्यपाल महाराजांनी दिला.उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कारआयोजकांच्या वतीने सत्यपाल महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन मनोहर चंद्रीकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे रामदास बोरकर, दुर्योधन मैंद, विजय डोये, राधेश्याम तरोणे, शकुंतला वालदे, गोवर्धन बडवाईक, अरुण ढवळे, राकेश वट्टी, हिरामन नंदनवार, राजू फुंडे, विलास राऊत, संदीप येरणे, चिंतामन शिवणकर, भाऊदास गायकवाड, ओमप्रकाश येळे, पप्पू पवार, चिंतामन हटवार, हरिचंद मेश्राम, नरेंद्र कोडापे, जिजा चांदेवार, शारदा नाकाडे यांचा सत्कार करण्यात आला.