शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

शिक्षणासोबतच चांगला माणूस निर्माण करा!

By admin | Updated: March 23, 2017 01:08 IST

बौद्धिक ज्ञानवृद्धी व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. घराघरातून बाल मनावर संस्कार दिले गेले पाहिजे.

संजय पुराम : भरनोली येथील डिजिटल शाळेचे उद्घाटन अर्जुनी-मोरगाव : बौद्धिक ज्ञानवृद्धी व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. घराघरातून बाल मनावर संस्कार दिले गेले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशवासीयांना ‘माणूस द्या मज माणूस द्या’ हा मूलमंत्र दिला. याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच ‘माणूस’ निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. गुरुजनांनी कर्तव्य म्हणून हे कार्य करावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी केले. ते आदिवासी, दुर्गम क्षेत्रात येणाऱ्या भरनोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल शाळा उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, पं.स.चे माजी सभापती तानेश ताराम, भरनोली गट ग्रा.पं.च्या सरपंच प्रमिला कोरामी, कन्हैयालाल राऊत, माणिक ठलाल, प्रेमानंद मसराम, गोंगलू ताराम, संजय मानकर, एकनाथ चुटे, उध्दव ताराम, भुमेश्वर ताराम, केंद्रप्रमुख वाय.बी. येल्ले, ग्रामसेवक नरेश बडोले, शिक्षक संघटनेचे कैलास हांडगे, विनोद बडोले, सुरेंद्रकुमार ठवरे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शिक्षण हे अजरामर आहे. ते मृत्यूपर्यंत संपत नाही. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. मोठी स्वप्नं बघितली पाहिजे. ध्येय निश्चितीकडे वाटचाल करताना अनेक अडचणी येतात. आईवडील व गुरुजनांचे निसंकोचपणे मार्गदर्शन घेऊन मार्गक्रमण केल्यास यशोशिखर गाठता येते. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी लाजाळू पण हुशार असतात. वावरताना न्यूनगंड बाळगू नका. पालकांनी मुलांवर निश्चित प्रेम केलं पाहिजे. पण त्यात आंधळे होऊ नका. कर्करोग हा असाध्य आजार उपचाराने बरा होऊ शकतो. मात्र हल्लीची पिढी मोबाईलच्या अत्याधिक वापरापासून बरी होत नाही. पालकांनी नियंत्रण घातले पाहिजे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने जूने दिवस व मातृभूमीचे प्रेम कदापी विसरु नये. प्रत्येकाने पदाचा वापर लोकसेवेसाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. तत्पूर्वी आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील केवळ ४० पटसंख्या असलेल्या भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल शाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेली ही शाळा लोकसहभागातून डिजिटल शाळा म्हणून नावारुपास आली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना संगणक हाताळणीसह शैक्षणिक तंत्रज्ञानाची जाणीव व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. यावेळी याच शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर जाणारे प्रा. धनराज करचाल, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, शाळेसाठी जमीनदाते घुंगरु ताराम, चरणदास कऱ्हाडे व सदू दर्रो यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक नाईक यांनी मांडले. संचालन प्रफुल्ल कुंभरे यांनी केले. आभार शिक्षिका बोरकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)