शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

अपघाताचा तपास दडपणात

By admin | Updated: July 12, 2017 02:23 IST

आमगाव पोलीस ठाणे येथील विविध प्रकरणांतील तपास कार्यातील तफावत व आरोपींना शह देण्याच्या

पोलीस संरक्षणात आरोपी पसार : न्यायासाठी टेकचंदच्या विधवेची पायपीट लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : आमगाव पोलीस ठाणे येथील विविध प्रकरणांतील तपास कार्यातील तफावत व आरोपींना शह देण्याच्या कार्यपद्धतीमुळे न्याय मागण्याची विभागाकडून निराशा होत आहे. यातच अपघात प्रकरणातील आरोपींना शह मिळत असल्याने तपास कार्यावर दडपणाचे पांघरुन घालण्यात येत आहे. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या टेकचंदच्या विधवेला न्याय मिळवून घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टेकचंद बळीराम शेंडे (३५) ३० एप्रिल रोजी गोंदियाकडे वाहन क्रमांक एमएच ३५/क्यु-४३४६ ने जात असताना मागून येत असलेल्या टाटा इंडिका गाडी क्रमांक एमएच ३५/पी-७२१५ ने त्यांना दहेगाव येथे जबर धडक दिली. यात टेकचंद शेंडे गंभीर जखमी झाला व टाटा इंडिका वाहन चालकाने शासकीय रुग्णवाहिका बोलावून घेतली. परंतु रुग्णवाहीकेला उशीर होत असल्याने इंडिका वाहन चालकाने जखमी टेकचंदला आपल्या गाडीत टाकले व घेऊन गेला. मात्र अदासी-तांडा पर्यंत आल्यावर वाटेत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने त्याने जखमी टेकचंदला रुग्णवाहिकेत टाकले व पसार झाला. रूग्णवाहिकेने जखमी टेकचंद शेंडे यांना प्रथम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु त्यांच्या डोक्यावर जबर मार असल्याने नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पीटल येथे त्याच दिवशी दाखल करण्यात आले. या रुग्णालयात सलग १६ दिवस उपचारानंतर तो घरी परतला. परंतु १९ मे रोजी प्रकृती खालावल्याने टेकचंद यांचा मृत्यू झाला. या अपघाताची पूर्ण माहिती दिल्यावरही पोलीस विभागाने वेळीच दखल घेतली नाही. घटनेसंदर्भात पोलीस पाटील संजू फुंडे यांनी पोलीस ठाण्यात सूचना केली. त्यावर मृतकाची चौकशी करण्यात आली. १९ मे रोजी मृतकाचे शवविच्छेदन करुन पार्थीव कुटूंबीयांना सोपविण्यात आले. परंतु अपघातातील आरोपीचा थांगपत्ता लागला नाही. तर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुध्द भादंविच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपीला शह दिला. त्यामुळे मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरही साधी दखल घेण्यात आली नाही. घटनास्थळाचा पंचनामा नाही ३० एप्रिल रोजी दहेगाव येथे राज्यमार्गावर मृत टेकचंद यांच्या वाहनाला टाटा इंडिका वाहन क्रं. एमएच३५/पी-७२१५ ने जबर धडक दिली. या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला नाही. तर टेकचंदचा मृत्यू १९ मे रोजी झाला यावेळी पोलीस विभागाने मृतकाच्या घराचा पंचनामा २० मे रोजी करुन तपासात तफावत निर्माण केली. विशेष म्हणजे, घटनेचा तपास सखोल व्हावा व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मृताची पत्नी हेमलता शेंडे यांनी पोलीस अधीक्षकांना १९ जून रोजी लेखी तक्रार केली. यावर पोलीस अधिक्षकांनी सदर घटनेची दखल घेण्याचे लेखी निर्देश दिले होते. परंतु त्यांच्या निर्देशाचीही दखल घेण्यात आली नाही. न्यायाची मागणी माझ्या पतीचा अपघात झाल्यानेच मृत्यू झाला. अपघात घडविणाऱ्या वाहनाची माहिती पोलीस विभागाला आहे. परंतु कारवाई शून्य आहे. पोलीस प्रशासनाने मला न्याय द्यावा. अशी हाक मृताची पत्नी हेमलता शेंडे यांनी पोलीस प्रशासनाकडे लावली आहे. तसेच प्रकरणाला दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस शिपाई लांजेवार यांच्यावर कारवाईची