शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

रानडुकरांनी घातला धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

केशोरी : या परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या स्थितीत ...

केशोरी : या परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या स्थितीत हलक्या जातीच्या धानाचा निसावा परिपूर्ण झाला आहे. अवघ्या आठ दहा दिवसांत हलक्या जातीच्या धानाचे पीक शेतकऱ्यांचा हातात पडेल, अशी स्थिती असताना निसवा झालेल्या धानावर रात्रीच्या वेळेस रानडुकरांचे कळप शेतात शिरुन धान पिकांचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने लक्ष देवून रानडुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात हलक्या जातीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली असून, सध्या स्थितीत हलक्या धानाचा निसवा पूर्णपणे झाला आहे. जंगल लागून असलेल्या शेतशिवारात रात्रीच्या वेळेस रानडुकरांचे कळप शेतात प्रवेश करुन धान पिकाचे नुकसान करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी रानडुकरांपासून धान पिकाचे होत असलेले नुकसान वाचविण्याच्या प्रयत्नात कापडी साड्यांचे कुंपण केले आहे. परंतु रानडुकरांचे कळप साड्यांचे कुंपण फाडून शेतात प्रवेश करुन मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान करीत आहेत. ऐन हलक्या धान पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडेल एवढ्यात रानडुकरांचा हैदोस वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. याकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.