शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

संस्थांच्या कमिशनचा चेंडू मुख्यमंत्र्यांचा कोर्टात

By admin | Updated: December 25, 2015 02:26 IST

केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात सेवा सहकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून...

१५ वर्षांपासून समस्या : आदिवासी सोसायट्यांची धान खरेदी वांद्यातविजय मानकर  सालेकसाकेंद्र व राज्य शासनाच्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात सेवा सहकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानावरील कमिशनपैकी ६० टक्के रक्कम मागील १५ वर्षांपासून मिळालीच नाही. याबद्दल प्रधान सचिवांनी ही रक्कम दिल्याचे सांगत हा प्रश्न टोलवला तर आदिवासी विकास महामंडळाने ही रक्कम मिळालीच नसल्याचे सांगून हा वर केले. दोघांच्या या विरोधाभासी माहितीमुळे धान खरेदी करणाऱ्या सोसायट्यांपुढे संभ्रमाची स्थिती आहे. आता हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे गेला असून तेच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. त्यांच्या कमिशनमधील ४० टक्के रक्कम, अर्थात प्रतीक्विंटल १० रुपये प्रमाणे त्यांना लगेच दिली जाते. उर्वरीत ६० टक्के कमिशन धानाची भरडाई (मिलिंग) झाल्यानंतर दिले जाते. परंतु ते ६० टक्के कमिशन मागील १५ वर्षापासून मिळालेच नाही. संस्था चालकांनी वारंवार मागणी करूनही त्यांना ती रक्कम देण्यात आली नाही. धान खरेदी केंद्रांवर आदिवासी सहकारी संस्थांना ४० टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त रकमेचा खर्च असतो. परंतु उर्वरित ६० टक्के रक्कम मिळणार या आशेवर संस्थाचालक स्वत:चे पैसे खर्च करून खरेदी केंद्र चालवतात. एवढेच नाही तर संकलीत धानाची देखरेखसुध्दा करतात. मोठ्या प्रमाणावर सतत खर्च लागत असल्याने जवळपास सर्व संस्था चांगल्याच कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळ म्हणते की, शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने संस्थांना उर्वरीत ६० टक्के कमिशन देण्यात आले नाही. या प्रकरणी जिल्ह्यातील संस्था चालकांनी जिल्हाध्यक्ष शंकरलाल मडावी यांच्या नेतृत्वात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क केला व त्यांच्या मदतीने पणन विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली. कपूर यांनी संस्था चालकांची सभा बोलावून धान खरेदीची ५०० कोटी रुपयांची रक्कम आदिवासी विकास महामंडळाला देण्यात आल्याचे तसेच १० कोटी रुपये अग्रीम सुध्दा देण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र रक्कम न मिळाल्याचे सांगून महामंडळ शासनाला बदनाम करीत आहे, असे कपूर यांनी सभेत सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी महामंडळाला सक्त ताकीदही दिली. तरीसुध्दा महामंडळाने संस्थांना उर्वरीत कमिशन दिलेच नाही.