शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

संस्थांच्या कमिशनचा चेंडू मुख्यमंत्र्यांचा कोर्टात

By admin | Updated: December 25, 2015 02:26 IST

केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात सेवा सहकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून...

१५ वर्षांपासून समस्या : आदिवासी सोसायट्यांची धान खरेदी वांद्यातविजय मानकर  सालेकसाकेंद्र व राज्य शासनाच्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात सेवा सहकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानावरील कमिशनपैकी ६० टक्के रक्कम मागील १५ वर्षांपासून मिळालीच नाही. याबद्दल प्रधान सचिवांनी ही रक्कम दिल्याचे सांगत हा प्रश्न टोलवला तर आदिवासी विकास महामंडळाने ही रक्कम मिळालीच नसल्याचे सांगून हा वर केले. दोघांच्या या विरोधाभासी माहितीमुळे धान खरेदी करणाऱ्या सोसायट्यांपुढे संभ्रमाची स्थिती आहे. आता हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे गेला असून तेच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. त्यांच्या कमिशनमधील ४० टक्के रक्कम, अर्थात प्रतीक्विंटल १० रुपये प्रमाणे त्यांना लगेच दिली जाते. उर्वरीत ६० टक्के कमिशन धानाची भरडाई (मिलिंग) झाल्यानंतर दिले जाते. परंतु ते ६० टक्के कमिशन मागील १५ वर्षापासून मिळालेच नाही. संस्था चालकांनी वारंवार मागणी करूनही त्यांना ती रक्कम देण्यात आली नाही. धान खरेदी केंद्रांवर आदिवासी सहकारी संस्थांना ४० टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त रकमेचा खर्च असतो. परंतु उर्वरित ६० टक्के रक्कम मिळणार या आशेवर संस्थाचालक स्वत:चे पैसे खर्च करून खरेदी केंद्र चालवतात. एवढेच नाही तर संकलीत धानाची देखरेखसुध्दा करतात. मोठ्या प्रमाणावर सतत खर्च लागत असल्याने जवळपास सर्व संस्था चांगल्याच कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळ म्हणते की, शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने संस्थांना उर्वरीत ६० टक्के कमिशन देण्यात आले नाही. या प्रकरणी जिल्ह्यातील संस्था चालकांनी जिल्हाध्यक्ष शंकरलाल मडावी यांच्या नेतृत्वात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क केला व त्यांच्या मदतीने पणन विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली. कपूर यांनी संस्था चालकांची सभा बोलावून धान खरेदीची ५०० कोटी रुपयांची रक्कम आदिवासी विकास महामंडळाला देण्यात आल्याचे तसेच १० कोटी रुपये अग्रीम सुध्दा देण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र रक्कम न मिळाल्याचे सांगून महामंडळ शासनाला बदनाम करीत आहे, असे कपूर यांनी सभेत सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी महामंडळाला सक्त ताकीदही दिली. तरीसुध्दा महामंडळाने संस्थांना उर्वरीत कमिशन दिलेच नाही.