शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

भारतीय राज्यघटनेमुळे देश एकसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:54 IST

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून भारताच्या सर्व जातीधर्मांचे कल्याण केले. बाबासाहेबांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे संविधान लिहून भारत एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले,....

ठळक मुद्देराजकुमार बडोले : सडक-अर्जुनी येथे ‘एक शाम शहिदों के नाम’

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून भारताच्या सर्व जातीधर्मांचे कल्याण केले. बाबासाहेबांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे संविधान लिहून भारत एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.तेजस्विनी लॉनमध्ये सत्यभामा बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था सडक अर्जुनी आणि मित्रपरिवारातर्फे शुक्रवारी ‘एक शाम शहिदों के नाम’ कार्यक्रम घेण्यात आले. यात उद्घाटनप्रसंगी ना. राजकुमार बडोले बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रकाश चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. उपसभापती राजेश कठाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, नगरसेवक देवचंद तरोणे, नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, सौंदडच्या सरपंच गायत्री इरले, आयोजन समितीचे अध्यक्ष एफ.आर.टी. शहा, गौरव पुस्तिकेचे संपादक कविता रंगारी, प्रा. राजकुमार भगत, स्वागताध्यक्ष किशोर डोंगरवार, तेजराम मडावी उपस्थित होते.या वेळी बडोले यांनी भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. देशभक्ती गीत स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. एफ.आर.टी. शहा, प्रा. राजकुमार भगत, तेजराम मडावी यांनी मार्गदर्शन केले.यानंतर लगेच बक्षीस वितरण सोहळा मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. अतिथी म्हणून डुग्गीपारचे ठाणेदार किशोर पर्वते, किशोर डोंगरवार, एफ.आर.टी. शहा, प्रा. राजकुमार भगत, तेजराम मडावी उपस्थित होते.समूह देशभक्ती नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळविणाºया पार्थ ज्युनिअर कॉलेजच्या चमूला ७ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र; द्वितीय पुरस्कार लोकमान्य शाळा कोकणा ५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र; तृतीय पुरस्कार मिळविणाऱ्या साकोलीच्या जितेंद्र मेश्राम गृपला ३ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. एकल देशभक्ती गीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या गोरेगावच्या समृद्धी बहेकार हिला ५ हजार रुपये, द्वितीय गायत्री राठोड ३ हजार रूपये व तृतीय आलेल्या कोकणा येथील पवनकुमार शेंडे याला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.संचालन अशोक लांजेवार यांनी केले. आभार सत्यभामा बहुउद्देशिय संस्थेचे सचिव महेंद्र चंद्रिकापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला महेश सूर्यवंशी, रंजिता मेश्राम, प्रा. अश्विन लांजेवार, बी.एम. रामटेके, मार्कंड चौरे, अतुल फुले, मनोज खंडेलकर, सुधाकर कुर्वे, रजनीश पंचभाई, उमेश कोटांगले, रजनीश मेश्राम, छगन कावळे, जियालाल रंगारी, नरेश डोंगरे, निकेश उके, डॉ. परमानंद कठाणे, सैयद शादीक अली, संध्या चंद्रिकापुरे यांनी सहकार्य केले.गौरव पुस्तिकेचे प्रकाशनप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सडक अर्जुनी तालुक्यातील संपूर्ण माहिती असणारी गौरव पुस्तिका काढून तिचे ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तालुक्यातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव ग्रंथामध्ये समावेश करण्यात आला. तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. यामध्ये डॉ. प्रभाकर गहाणे, मेहजबिन राजानी, प्रभू डोंगरवार, बापूसाहेब इरले, आर.व्ही. मेश्राम, सृष्टी फाऊंडेशन, मधुसूदन दोनोडे, अनिल मेश्राम यांचा समावेश आहे.