शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

देशविघातक कृत्यांना सडेतोड उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:03 IST

देश विकासाच्या वाटेवर सतत अग्रेसर आहे. परंतु आपल्या देशाचे शत्रू देशात घातपात घडविण्यासाठी मनसुबे आखत राहतात. आपले सरकार वेळीचे त्यांचे मनसुबे हाणून पाडून आपल्या सक्रितेचा परिचय देते. जे जवान देश रक्षण करताना शहीद झाले त्या भारत मातेच्या पुत्रांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही.

ठळक मुद्देपालकमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : पदमपूर येथे ‘एक शाम शहिदों के नाम’ कार्यक्रम थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : देश विकासाच्या वाटेवर सतत अग्रेसर आहे. परंतु आपल्या देशाचे शत्रू देशात घातपात घडविण्यासाठी मनसुबे आखत राहतात. आपले सरकार वेळीचे त्यांचे मनसुबे हाणून पाडून आपल्या सक्रितेचा परिचय देते. जे जवान देश रक्षण करताना शहीद झाले त्या भारत मातेच्या पुत्रांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. देशातील जनता त्यांची चिरकाल आठवण ठेवणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा विशेष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.ग्राम पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशीय विकास संस्था व उडाण बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्तवतीने शुक्रवारी (दि.२६) पदमपूर येथील राष्टÑसंत तुकडोजी चौकात ‘एक शाम शहिदों के नाम’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, सामाजिक कार्यकर्ता अंजली जांभूळकर व यशवंत प्रामुख्याने मानकर उपस्थित होते.या वेळी दीनदुबळ्यासांठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती ना. बडोले यांनी दिली. शहीद भगतसिंग व महाकवी भवभूती यांच्या प्रतिमांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. देशभक्ती गीतांवर समूह व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सई काळे यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून नागरिकांना संबोधित केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून तसेच नागपूर, भंडारा या शहरातील स्पर्धकांनी २० समूह नृत्य व २२ एकलनृत्य सादर केले. स्पर्धेप्रसंगी तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक शशीकांत दसुरकर, मुख्याध्यापक शरद उपलपवार यांनी उपस्थित होते. प्रास्ताविक नरेश रहिले यांनी मांडले.संचालन सुनंदा हुकरे व रामभरोस चक्रवर्ती यांनी केले. आभार आशिष तलमले यांनी मानले. कार्यक्रमासाठी हरीश भुते, नरेश बोहरे, दीपक भांडारकर, अतुल फुंडे, रविकांत पाऊलझगडे, शैलेश लक्षणे, प्रतिक करंडे, प्रेमानंद पाथोडे, दिनेश गिºहेपुंजे, सुनिल हुकरे, प्रिनल वंजारी, हिमालय राऊत, महेंद्र गिºहेपुंजे, प्रदीप कावरे, जीवन फुंडे, राकेश नेवारे, गोविंद बहेकार, राकेश शिवणकर, मुकेश शिवणकर, उज्वल वंजारी, कुलदीप हुकरे, सचिन तलमले, शांतनू तावाडे, मनोज कावरे, हाार्दीक भुते, अरविंद भुते व इतरांनी सहकार्य केले.शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार‘एक शाम शहीदोंके नाम’ या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री तसेच विशेष सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या पत्नी पुष्पा दीपक रहिले, बेवारटोला नक्षलस्फोटात शहीद झालेले मुलचंद भोयर यांचे वडील शामराव भोयर व आई राधिका भोयर, बेवारटोला नक्षलस्फोटात शहीद झालेले भोजराज बाभरे यांचे वडील शंकर बाभरे व आई राईबाई बाभरे, गडचिरोली जिल्ह्याच्या मोठा झालीया येथे शहीद झालेले ईशांतकुमार भुरे यांचे वडील रामरतन भुरे व आई शीला भुरे यांचा व इतर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.