शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या वांरवार लक्षात आणून दिली. तर मागील पंधरा दिवसापासून सफाई कर्मचारी सुध्दा प्रभागात येत नसल्याने या समस्येत पुन्हा वाढ झाली.

ठळक मुद्देकचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याची तक्रार : बसपा नगरसेवकांचा पवित्रा, नगर परिषदेत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून नगर परिषदेच्या कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. परिणामी शहरातील केरकचऱ्याच्या समस्येने बिकट रुप धारण केले आहे. वांरवार स्वच्छता विभागाला केरकचऱ्याची उचल करण्याची सूचना देऊनही उचल केली जात नसल्याने संतप्त झालेल्या बसपाचे नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी गुरूवारी(दि.९) दुपारी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या व स्वच्छता विभागाच्या कक्षात कचरा टाकून संताप व्यक्त केला. यामुळे घटनेमुळे नगर परिषदेत खळबळ उडाली होती.नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या वांरवार लक्षात आणून दिली. तर मागील पंधरा दिवसापासून सफाई कर्मचारी सुध्दा प्रभागात येत नसल्याने या समस्येत पुन्हा वाढ झाली. आपण या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने नागरिक आपल्याला याचा जाब विचारत होते. त्यामुळे नगर परिषदेला या समस्येची जाणीव करुन देण्यासाठी नगराध्यक्षाच्या कक्षात आणि स्वच्छता विभागात केरकचरा टाकल्याचे ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी सांगितले. केरकचऱ्यासह प्रभागातील नाल्यांची सुध्दा अद्याप साफ सफाई करण्यात आली नसल्याने सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. रस्त्यावरुन घाणपाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात नगर परिषद स्वच्छता विभागात विचारणा केली असता सफाई कर्मचारी कामावर येत नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे सांगितले. मात्र इतर वार्डातील साफ सफाईची कामे नियमित सुरू असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडील वाहनात डिझेल नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे या विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या समस्येची जाणीव नगराध्यक्ष आणि नगर परिषदेला व्हावी यासाठी नगराध्यक्ष व सफाई विभागाच्या कक्षात कचरा आणून टाकल्याने दोन्ही नगरसेवकांनी सांगितले.प्रभागातील समस्या सांगण्यासाठी माझे पती नगराध्यक्षांच्या कक्षात गेले होते मात्र त्यांची समस्या ऐकून घेण्याऐवजी नगराध्यक्षांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप ज्योत्सना मेश्राम यांनी केला. यावरून नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकांमध्ये जवळपास अर्धातास वाद झाला. या वेळी काही नगरसेवक देखील उपस्थित होते.दरम्यान यावर जाब विचारण्यासाठी नगराध्यक्षांनी सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन बोलविले, मात्र अर्धा तासापर्यंत कुणीही आले नव्हते.दरम्यान या प्रकारमुळे नगर परिषद पुन्हा चर्चेत आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी नगर परिषद परिसरात असा प्रकार करणे उचित नसून आपण या प्रकाराचा निषेध करीत असल्याचे सांगितले.सफाई कामगारांनी केली निदर्शनेमागील अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांनी याच दरम्यान नगर परिषदेसमोर निदर्शने केले. कंत्राटदाराने त्यांना कामावरुन कमी केल्याचा आरोप केला. मागील १२ वर्षांपासून या सफाई कामगारांना केवळ २०० रुपये प्रती दिन मजुरी दिली जात आहे. त्यातच मागील तीन महिन्याचे वेतन नगर परिषदेने दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासन नियमानुसार सफाई कामगारांना ३७० रुपये प्रती दिन मजुरी देण्याची तरतूद असताना त्यांना केवळ १५० ते २०० रुपये मजुरी देऊन त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला. या विरोधात त्यांनी नगर परिषदेसमोर निदर्शने केली.न.प.च्या अनागोंदी कारभाराला जिल्हाधिकारी जवाबदार असल्याचा आरोपमागील तीन महिन्यांपासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील हे रजेवर आहेत. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरोश्यावर नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. मात्र त्यांच्यावर सुध्दा दोन नगर परिषदेचा पदभार आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कारभाराचा पुर्णता बोजवारा उडाला आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून नगर परिषदेत अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र यासर्व प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराला त्याच जवाबदार असल्याचा आरोप नगरसेवक पकंज यादव यांनी केला.१५ दिवसांपासून केरकचऱ्यांची समस्याशहरातील प्रभाग क्रमांक १४ व १६ या दोन्ही प्रभागात मागील १५ दिवसांपासून केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. नाल्यांमधील गाळाचा उपसा न केल्याने नाल्यांमधील सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्या चोख झाल्याने रस्त्यावरुन घाण पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर सफाई कामगारांचे वेतन सुध्दा थकले असल्याने त्यांनी सुध्दा असहकाराची भुमिका घेतली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी