शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या वांरवार लक्षात आणून दिली. तर मागील पंधरा दिवसापासून सफाई कर्मचारी सुध्दा प्रभागात येत नसल्याने या समस्येत पुन्हा वाढ झाली.

ठळक मुद्देकचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याची तक्रार : बसपा नगरसेवकांचा पवित्रा, नगर परिषदेत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून नगर परिषदेच्या कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. परिणामी शहरातील केरकचऱ्याच्या समस्येने बिकट रुप धारण केले आहे. वांरवार स्वच्छता विभागाला केरकचऱ्याची उचल करण्याची सूचना देऊनही उचल केली जात नसल्याने संतप्त झालेल्या बसपाचे नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी गुरूवारी(दि.९) दुपारी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या व स्वच्छता विभागाच्या कक्षात कचरा टाकून संताप व्यक्त केला. यामुळे घटनेमुळे नगर परिषदेत खळबळ उडाली होती.नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या वांरवार लक्षात आणून दिली. तर मागील पंधरा दिवसापासून सफाई कर्मचारी सुध्दा प्रभागात येत नसल्याने या समस्येत पुन्हा वाढ झाली. आपण या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने नागरिक आपल्याला याचा जाब विचारत होते. त्यामुळे नगर परिषदेला या समस्येची जाणीव करुन देण्यासाठी नगराध्यक्षाच्या कक्षात आणि स्वच्छता विभागात केरकचरा टाकल्याचे ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी सांगितले. केरकचऱ्यासह प्रभागातील नाल्यांची सुध्दा अद्याप साफ सफाई करण्यात आली नसल्याने सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. रस्त्यावरुन घाणपाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात नगर परिषद स्वच्छता विभागात विचारणा केली असता सफाई कर्मचारी कामावर येत नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे सांगितले. मात्र इतर वार्डातील साफ सफाईची कामे नियमित सुरू असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडील वाहनात डिझेल नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे या विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या समस्येची जाणीव नगराध्यक्ष आणि नगर परिषदेला व्हावी यासाठी नगराध्यक्ष व सफाई विभागाच्या कक्षात कचरा आणून टाकल्याने दोन्ही नगरसेवकांनी सांगितले.प्रभागातील समस्या सांगण्यासाठी माझे पती नगराध्यक्षांच्या कक्षात गेले होते मात्र त्यांची समस्या ऐकून घेण्याऐवजी नगराध्यक्षांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप ज्योत्सना मेश्राम यांनी केला. यावरून नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकांमध्ये जवळपास अर्धातास वाद झाला. या वेळी काही नगरसेवक देखील उपस्थित होते.दरम्यान यावर जाब विचारण्यासाठी नगराध्यक्षांनी सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन बोलविले, मात्र अर्धा तासापर्यंत कुणीही आले नव्हते.दरम्यान या प्रकारमुळे नगर परिषद पुन्हा चर्चेत आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी नगर परिषद परिसरात असा प्रकार करणे उचित नसून आपण या प्रकाराचा निषेध करीत असल्याचे सांगितले.सफाई कामगारांनी केली निदर्शनेमागील अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांनी याच दरम्यान नगर परिषदेसमोर निदर्शने केले. कंत्राटदाराने त्यांना कामावरुन कमी केल्याचा आरोप केला. मागील १२ वर्षांपासून या सफाई कामगारांना केवळ २०० रुपये प्रती दिन मजुरी दिली जात आहे. त्यातच मागील तीन महिन्याचे वेतन नगर परिषदेने दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासन नियमानुसार सफाई कामगारांना ३७० रुपये प्रती दिन मजुरी देण्याची तरतूद असताना त्यांना केवळ १५० ते २०० रुपये मजुरी देऊन त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला. या विरोधात त्यांनी नगर परिषदेसमोर निदर्शने केली.न.प.च्या अनागोंदी कारभाराला जिल्हाधिकारी जवाबदार असल्याचा आरोपमागील तीन महिन्यांपासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील हे रजेवर आहेत. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरोश्यावर नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. मात्र त्यांच्यावर सुध्दा दोन नगर परिषदेचा पदभार आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कारभाराचा पुर्णता बोजवारा उडाला आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून नगर परिषदेत अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र यासर्व प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराला त्याच जवाबदार असल्याचा आरोप नगरसेवक पकंज यादव यांनी केला.१५ दिवसांपासून केरकचऱ्यांची समस्याशहरातील प्रभाग क्रमांक १४ व १६ या दोन्ही प्रभागात मागील १५ दिवसांपासून केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. नाल्यांमधील गाळाचा उपसा न केल्याने नाल्यांमधील सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्या चोख झाल्याने रस्त्यावरुन घाण पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर सफाई कामगारांचे वेतन सुध्दा थकले असल्याने त्यांनी सुध्दा असहकाराची भुमिका घेतली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी