शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोरोनाच्या भडक्याचा एसटीच्या तिजोरीवर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST

गोंदिया : देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक वाढला असून, त्यातही राज्यातील स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमण ...

गोंदिया : देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक वाढला असून, त्यातही राज्यातील स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमण असल्याने बाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात बाधित व मृतांची संख्या वेगाने वाढत असून, हा वाढता धोका पाहता आता राज्य शासनाने लॉकडाऊन लावला आहे. परिणामी कोरोनाची भीती बघता नागरिकांनी प्रवास टाळण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळावर पडत असून, एसटी तोट्यात येत आहे.

मागीलवर्षी एसटीची चाके थांबली होती व त्यामुळे एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात थोडाफार दिलासा देणारे चित्र निर्माण झाले असतानाच, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे राज्य शासनाने कठोर निर्बंध लावल्याने नागरिकांनीही प्रवास टाळला आहे. हेच कारण आहे की, भरभरून धावणारी एसटी आता मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावत आहे. याचा फटका आगाराच्या तिजोरीवर पडत असून, असेच सुरू राहिल्यास डिझेल टाकण्यासाठीही पैसे राहणार नाहीत, अशी स्थिती येणार, यात शंका नाही.

-------------------------------

- आगारातील एकूण बसेस - ८०

- एकूण कर्मचारी - ३१५

- चालक- १३३

- वाहक - १०३

- रोजच्या फेऱ्या - २२०

- रोजचे नुकसान- ३ ते ४ लाख रुपये

-------------------------------

मागील वर्षही गेले तोट्यात

मागीलवर्षी मार्च महिन्यातच कोरोनाचा कहर सुरू झाला होता व २४ मार्चपासून अवघ्या देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यात प्रवासावरही निर्बंध होते व त्यामुळे एसटीची चाके थांबली होती. यामुळे एसटी चांगलीच तोट्यात गेली होती. आता परिस्थिती हळूवार सुधारताना दिसून येत होती, तोच पुन्हा एकदा कोरोनाने आपला रंग दाखवून दिला. यामुळे आता नागरिकांनी पुन्हा प्रवास थांबविला असून, त्याचा फटका आगारावर पडताना दिसत आहे.

----------------------------

परिस्थिती बघूनच फेऱ्यांचा विचार

जिल्ह्यात सध्या आहे त्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र मध्यप्रदेशला जाणाऱ्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. फेऱ्या बंद करण्याबाबत सध्या काहीच सूचना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील फेऱ्या नियमित सुरू आहेत. आता प्रवासी घटत असल्याने एसटी कमी प्रवाशांना घेऊन धावत आहे. मात्र फेऱ्या बंद करण्याचा विचार आतापर्यंत करण्यात आलेला नाही. पुढील परिस्थिती बघूनच फेऱ्यांचा विचार केला जाणार.

----------------------------

कोट

कोरोना उद्रेकामुळे नागरिकांकडून प्रवास टाळला जात आहे. याचा फटका एसटीवर पडत असून, आगाराचे दररोज ३ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे. प्रवासी कमी झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढचे नियोजन केले जाईल.

- संजना पटले,

आगारप्रमुख, गोंदिया.