शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना ५६ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली. ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या संसर्गाला घेऊन सुरुवातीपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या दंडापोटी एक लाख ४७ हजार ५३७ लोकांकडून ५५ लाख ९३ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई मार्च २०२० ते २६ फेब्रुवारी २०२१ या काळातील आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही लोक फिजिकल डिस्टन्स न ठेवता गर्दी करतात. तसेच तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असून महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाने केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२० ते २६ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या १ हजार ६९२ जणांकडून १६ लाख १० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्या लोकांवर पहिल्या लाटेत ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. दुसऱ्यावेळी म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून मास्क न लावणाऱ्यांवर १०० रुपये दंड आकारला जात आहे.

सुरुवातीपासून २६ फेब्रुवारीपर्यंत मास्क न लावणाऱ्या १ लाख ४५ हजार ८४५ लोकांकडून ३९ लाख ८३ हजार ७०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. दंड म्हणून वसूल करण्यात आलेली रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आहे. या रकमेची काय विल्हेवाट लागते, याकडे लक्ष आहे.

-----------------------

१० दिवसांत तीन लाखांची वसुली

१६ ते २६ फेब्रुवारी या १० दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांत ३ लाख ५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात फिजिकल डिस्टन्सच्या ७७ प्रकरणांतून ७ हजार ७०० रुपये, तर मास्क न वापरणाऱ्या २ हजार ९७७ लोकांकडून दोन लाख ९७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या १० दिवसांच्या काळात तीन लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.

-------------------------

कारवायांत वाढ करण्याची गरज

पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असल्याने आता काही प्रमाणात नागरिक मास्क लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात ज्या सक्तीने कारवाया करण्यात आल्या तेवढी सक्ती सध्या दिसून येत नाही. परिणामी, कित्येक नागरिक मास्क व लावता फिरताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, मास्क न लावता कित्येक जण रस्त्याने जाता-जाता थुंकत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका वाढणार यात शंका नाही. परिणामी, अशांवर जबर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.