शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना ५६ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली. ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या संसर्गाला घेऊन सुरुवातीपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या दंडापोटी एक लाख ४७ हजार ५३७ लोकांकडून ५५ लाख ९३ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई मार्च २०२० ते २६ फेब्रुवारी २०२१ या काळातील आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही लोक फिजिकल डिस्टन्स न ठेवता गर्दी करतात. तसेच तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असून महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाने केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२० ते २६ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या १ हजार ६९२ जणांकडून १६ लाख १० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्या लोकांवर पहिल्या लाटेत ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. दुसऱ्यावेळी म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून मास्क न लावणाऱ्यांवर १०० रुपये दंड आकारला जात आहे.

सुरुवातीपासून २६ फेब्रुवारीपर्यंत मास्क न लावणाऱ्या १ लाख ४५ हजार ८४५ लोकांकडून ३९ लाख ८३ हजार ७०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. दंड म्हणून वसूल करण्यात आलेली रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आहे. या रकमेची काय विल्हेवाट लागते, याकडे लक्ष आहे.

-----------------------

१० दिवसांत तीन लाखांची वसुली

१६ ते २६ फेब्रुवारी या १० दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांत ३ लाख ५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात फिजिकल डिस्टन्सच्या ७७ प्रकरणांतून ७ हजार ७०० रुपये, तर मास्क न वापरणाऱ्या २ हजार ९७७ लोकांकडून दोन लाख ९७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या १० दिवसांच्या काळात तीन लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.

-------------------------

कारवायांत वाढ करण्याची गरज

पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असल्याने आता काही प्रमाणात नागरिक मास्क लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात ज्या सक्तीने कारवाया करण्यात आल्या तेवढी सक्ती सध्या दिसून येत नाही. परिणामी, कित्येक नागरिक मास्क व लावता फिरताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, मास्क न लावता कित्येक जण रस्त्याने जाता-जाता थुंकत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका वाढणार यात शंका नाही. परिणामी, अशांवर जबर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.