शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोंदिया जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग; रुग्णसंख्या २९० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:10 IST

१ ते १४ ऑगस्ट दरम्यान गोंदिया जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे.

ठळक मुद्दे३७ बाधितांची भर९ झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र असून १ ते १४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना  रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे. तर ९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४३७ वर पोहचली आहे.शुक्रवारी आढळलेल्या ३७ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १४, सालेकसा ४, सडक ३, तिरोडा १२, आमगाव १ आणि अजुर्नी मोरगाव तालुक्यातील २ कोरोना बाधितांचा समावेश आहे.मागील दहा ते बारा दिवसांपासून गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसगार्ची तर सुरूवात झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. विेशेष म्हणजे शहरी भागासह आता ग्रामीण भागात कोरोना बाधित अधिक रुग्ण आढळत असल्याने प्रशासनासह जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ आहे. तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासन पूर्णपण अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन केंद्रात सुध्दा योग्य सोयी सुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे या गोष्टी सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.गोंदिया व तिरोडा कोरोनाचे हॉटस्पॉटजिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे तिरोडा व गोंदिया तालुक्यात आढळले. या दोन्ही तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्यावर गेली आहे. तर दररोज या दोन्ही तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे.आरोग्य विभागाचा गाडा प्रभारीवरचकोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. तर आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यातील आरोग्याचा विभागाचा गाडा सध्या प्रभारींच्या भरोश्यावर सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा भार प्रभारींच्या भरोश्यावर सुरू आहे. तर कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा प्रशासनाने ५ जिल्हा शल्यचिकित्सक बदलले. त्यामुळे आरोग्य विभागाची अवस्था काय कशी दुबळी झाली हे दिसून येते.नागरिकांनो संसर्ग वाढतोय काळजी घ्यामागील दहा बारा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वाºयावर सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याची गरज आहे. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगचे आणि आरोग्य विभागाने दिलेल्या निदेर्शांचे काटेकोरपणे पालन करा. अत्यावशक काम असेल तरच घराबाहेर पडा, आपल्या समोरचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे समजून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस