शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या जिल्ह्यालाच कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST

गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता मागील महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा ...

गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता मागील महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असल्याने, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी, आज जिल्ह्यातील सर्वच तालुके पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त झाले असून, अवघ्या जिल्ह्यालाच कोरोनाची लागण झाली आहे.

मध्यंतरी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना दररोज २-४ बाधित आढळून येत होते. परिणामी, क्रियाशील रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा अवघ्या राज्यातच कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढताना दिसत आहे. हळुवार का असेना. मात्र, बाधितांची संख्या दररोज वाढू लागली असून, यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १४,६२४ बाधितांची नोंद घेण्यात आली होती. त्यातील १४,२५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता १८४ रुग्ण क्रियाशील आहेत. विशेष म्हणजे, क्रियाशील रुग्णांची ही आकडेवारी ५०च्या आत आली होती. मात्र, आता तीच आकडेवारी झपाट्याने वाढू लागली आहे. यावरून कोरोना जिल्ह्यातही आपले पाय पसरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात आता एकही तालुका कोरोनामुक्त राहिलेला नाही. यावरून येणारा धोका बघता, आतापासूनच सावध राहण्याची गरज आहे.

--------------------------

कारवायांची आता खरी गरज

कोरोनाचा वाढता धोका बघता, आता जिल्हा प्रशासनाने मास्क न लावणारे, शारीरिक अंतराचे पालन न करणारे, लग्न सोहळे व अन्य गर्दींच्या कार्यक्रमावर कारवाया करण्याची खरी गरज दिसून आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी याबाबत आदेश काढले होते व मात्र त्यानंतरही काहीच होत नसल्याने नागरिक बिनधास्त असून, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, हा प्रकार अंगलट येण्यासारखा असल्याने, गोंदियाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने हालचाल सुरू केली पाहिजे.

--------------------

बाजारात होते एकच गर्दी

कोरोनावर तोडगा म्हणून तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन हे दोन प्रभावी शस्त्र आहे. मात्र, गोंदियातील बाजारात बघता कोरोना पूर्णपणे संपल्यासारखे चित्र असून, येथे मास्क व शारीरिक अंतराचे पालन या नियमांना तिलांजली दिली जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने जिल्हा प्रशासनाने आता पूर्वीप्रमाणे पथक गठीत करून कारवायांना सुरुवात केली, तरच यावर आळा घालता येणार आहे, अन्यथा येणारा काळ जिल्ह्यासाठी धोक्याचा राहणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.