शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

गृहविलगीकरणातील कोरोना बाधित फिरताहेत रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:30 IST

नवेगावबांध : रॅपिड अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरणाची सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, बहुतांश ...

नवेगावबांध : रॅपिड अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरणाची सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, बहुतांश गृहविलगीकरणातील बाधित रस्त्यावर फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढत आहे.

ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरण केले जाते. स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र स्नानगृह असावे. मात्र अशा प्रकारची सुविधा ग्रामीण भागात कित्येकांकडे नसते. त्यामुळे घरातील व्यक्ती बाधित व्यक्तीकडून संसर्गित होत असल्याचे समोर येत आहे. दोन किंवा तीन खोल्यात संसार करणारे बाधित व्यक्ती खऱ्या अर्थाने गृहविलगीकरणाचे निकष पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी संसर्गाचा धोका वाढत आहे. तसेच शेजाऱ्यांनाही धोका पत्करावा लागत आहे. काही गावात कोरोनाबाधितांची घरे मायक्रो कंटोनमेंट झोन म्हणून स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने घोषित केले जात नाही. घराच्या भिंतीवर स्टीकर लावली जात नाहीत. त्यामुळे सदर कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आहेत, हेच शेजाऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे शेजारीदेखील संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येतो. परिणामी, बाधितांची संख्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही वाढत आहे. कार्य समित्या कुचकामी ठरत आहे. ग्रामपंचायतस्तरावर कार्य समित्यांचे गठन केले आहे. गावातील शाळा विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कोरोनाबाधितांच्या गृहविलगीकरणाची व्यवस्था असो की नसो, घरीच विलगीकरणात राहात आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका बळावला आहे.

.....

‘गृहविलगीकरणात असलेले बाधित व्यक्ती गावात फिरत असतात. अशा लोकांना पायबंद घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. याकडे ग्रामपंचायत व पोलीस खात्याने लक्ष द्यावे.

शैलेश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते

‘बाधित व्यक्तींच्या घराच्या भिंतीवर स्टिकर लावण्याच्या नियोजनाबद्दल तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या गावात स्टिकर लावले जात नाहीत. त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा निर्देश देऊ, गृहविलगीकरणात असलेली व्यक्ती गावात फिरत असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.

विनोद मेश्राम, तहसीलदार, अर्जुनी मोरगाव.

‘ज्याच्या घरी गृहविलगीकरणाच्या सुविधा नाहीत,त्यांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत केली जाईल, गृहविलगीकरणातील बाधितांनी बाहेर फिरू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, तशी दवंडी गावात दिली जाईल.

अनिरुध्द शहारे, सरपंच, नवेगावबांध