शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरला लागली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा १० टक्केच्या आत आहे, तर ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरला लागली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा १० टक्केच्या आत आहे, तर ऑक्सिजन बेडसुद्धा ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. त्यामुळे ब्रेक द चेनचे नियम थोडे शिथिल करण्यात आले. १ जूनपासून ॲनलॉक टूअंतर्गत शहरातील अत्यावश्यक आणि इतर दुकानेसुद्धा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केले. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने जणू जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याच्या आविर्भावात नागरिक वावरू लागले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्यांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे कोरोनाची संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता बळावली असून, पहिल्या लाटेत केलेल्या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच वेळीच चाचणी करणे आदी गोष्टींकडे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करताना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तरच कोरोनाची तिसरी लाट टाळणे शक्य आहे.

..............

या पाच चुका पुन्हा नकोच

१) कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर बंद केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. गर्दीच्या ठिकाणी जाणे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणाऱ्याकडे कानाडोळा केल्यानेच कोरोनाची दुसरी लाट आली.

२) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यानंतरही अनेकांनी स्वत:च्या मनाने औषधोपचार केला. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व कोरोनाची चाचणी केली नाही. परिणामी संसर्गात वाढ होण्यास मदत झाली.

३) बाधितांच्या संपर्कात आल्याची खात्री पटल्यानंतरही अनेक जण कोरोनाची चाचणी होम क्वारंटाइन राहण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत झाली.

४) होम क्वारंटाइनमध्ये असलेले रुग्ण गृहविलगीकरणात न राहता घराबाहेर फिरत होते. यामुळे कुटुंबासह इतरांनाही संसर्ग झाला आहे. औषधोपचाराकडे दुर्लक्ष.

५) गर्दीच्या ठिकाणी जाणे, आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन न करणे, कोरोनाची चाचणी न करणे, काय होतोयची प्रवृत्ती यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती नकोच.

........................

अनलॉक : पहिला दुसरा

दिनांक : ४ ऑगस्ट १ जून

एकूण रुग्ण : ४१० ४०७४०

एकूण मृत्यू : ०३ ६९०