शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरला लागली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा १० टक्केच्या आत आहे, तर ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरला लागली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा १० टक्केच्या आत आहे, तर ऑक्सिजन बेडसुद्धा ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. त्यामुळे ब्रेक द चेनचे नियम थोडे शिथिल करण्यात आले. १ जूनपासून ॲनलॉक टूअंतर्गत शहरातील अत्यावश्यक आणि इतर दुकानेसुद्धा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केले. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने जणू जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याच्या आविर्भावात नागरिक वावरू लागले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्यांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे कोरोनाची संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता बळावली असून, पहिल्या लाटेत केलेल्या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच वेळीच चाचणी करणे आदी गोष्टींकडे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करताना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तरच कोरोनाची तिसरी लाट टाळणे शक्य आहे.

..............

या पाच चुका पुन्हा नकोच

१) कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर बंद केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. गर्दीच्या ठिकाणी जाणे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणाऱ्याकडे कानाडोळा केल्यानेच कोरोनाची दुसरी लाट आली.

२) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यानंतरही अनेकांनी स्वत:च्या मनाने औषधोपचार केला. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व कोरोनाची चाचणी केली नाही. परिणामी संसर्गात वाढ होण्यास मदत झाली.

३) बाधितांच्या संपर्कात आल्याची खात्री पटल्यानंतरही अनेक जण कोरोनाची चाचणी होम क्वारंटाइन राहण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत झाली.

४) होम क्वारंटाइनमध्ये असलेले रुग्ण गृहविलगीकरणात न राहता घराबाहेर फिरत होते. यामुळे कुटुंबासह इतरांनाही संसर्ग झाला आहे. औषधोपचाराकडे दुर्लक्ष.

५) गर्दीच्या ठिकाणी जाणे, आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन न करणे, कोरोनाची चाचणी न करणे, काय होतोयची प्रवृत्ती यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती नकोच.

........................

अनलॉक : पहिला दुसरा

दिनांक : ४ ऑगस्ट १ जून

एकूण रुग्ण : ४१० ४०७४०

एकूण मृत्यू : ०३ ६९०