शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

गोंदिया शहरात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी १८९ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 06:00 IST

गुरूवारी (दि.३) जिल्ह्यात एकाच दिवशी १८९ कोराना बाधित आढळले असून यात सर्वाधिक १२१ रुग्ण गोंदिया शहरातील आहे.

ठळक मुद्देदोन रुग्णांचा मृत्यू, संसर्ग वाढतोय झपाट्याने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दहा बारा दिवसांपासून गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन आकडी रुग्ण संख्या आता तीन आकडी झाली आहे. गुरूवारी (दि.३) जिल्ह्यात एकाच दिवशी १८९ कोराना बाधित आढळले असून यात सर्वाधिक १२१ रुग्ण गोंदिया शहरातील आहे. दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून रुग्ण वाढीने कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर सर्वाधिक ९१ रुग्ण आढळले होते. मात्र सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी १३७ रुग्ण आढळले होते. तर गुरूवारी १८९ कोरोना बाधित आढळले. तर आमगाव आणि बालघाट येथील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.बुधवारपासून (दि.२) जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग तीन आकडी झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांपासून सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया आणि आमगाव तालुक्यात आढळत असल्याने ही दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट आणि उद्रेकाचे केंद्र झाले आहे.

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार सुध्दा पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे कोरोना संसर्ग वाढत असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासन सैल झाल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.३१) केटीएसमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांने माझ्या वडिलांचा मृत्यू हा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप केला होता. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ सुध्दा चांगलाच व्हायरल झाला. मात्र यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचीे दखल घेवून साधी चौकशी करण्याचे आदेश दिले नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात येथील प्रशासन किती गंभीर आहे दिसून येते.

गोंदिया शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवार आणि गुरूवारी जिल्ह्यात एकूण ३२५ कोरोना बाधित आढळले तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:ची काळजी घेत खबरदारी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमित हातपाय स्वच्छ धुवावे, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग आणि आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.

आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण कुणाचेजिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले. मात्र अजुनही रेफर टू नागपूर करण्याची पध्दत सुरू आहे. केटीएस असो वा बीजीडब्ल्यू रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाही. आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. तक्रारींचा खच वाढत असताना जिल्हा प्रशासन सुध्दा बघ्याची भूमिका पार पाडीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या