शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोनाने निर्माण केला शेजारधर्म व नातेसंबंधात दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

केशोरी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक संचारबंदी घोषित करून घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर ...

केशोरी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक संचारबंदी घोषित करून घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरू करण्यात आले होते. परत मार्च-एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले व शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाचा संसर्ग दिसून आला. त्यामुळे परत राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे शेजारधर्म आणि नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊन सासूरवाशिणीला माहेराला मुकावे लागले आहे. तर विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला मुकावे लागले. असा अनर्थ कोरोना विषाणूने केल्याचे या वर्षीही अनुभवास आले आहे.

कोरोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोरोनाने एकाकी जीवन जगावे हे शिकविले आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शहराशहरांतून संसर्ग वाढलेला दिसून आला होता. मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील गावागावांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले. यामुळे भयावह परिस्थिती पाहावयास मिळाली. या वैश्विक महामारीने गावातील चालते बोलते व्यवहार ठप्प झाले. एवढेच नव्हे तर शेजारी-शेजारी नातेवाईक व मित्र परिवार कोरोनाच्या भीतीने एकमेकांपासून दूर राहू लागले. कोणीही एकमेकांच्या घरी जात नाही. चुकून एखाद्या वेळेस जाण्याचा प्रसंग आलाच तर चक्क आमच्या घरी येऊ नका, असेही शब्द ऐकविण्यात आले आहेत. घराचे दार बंद करून घरातच राहणे, तोंडाला रुमाल बाधून एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नातून दुरावा जाणवत आहे. एकमेकांविषयी असलेली आपुलकी कोरोना विषाणूने कमी झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या जवळील नातेसंबंधातील मंडळीनेसुद्धा एकमेकांच्या घरी जाणे बंद केले. भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवनात आदरातिथ्याला अत्यंत महत्त्व दिले असले तरीही कोरोनाकाळात संस्कृती व परंपरा दूर सारल्या गेल्या. कोरोना विषाणूने शेजारधर्म व नातेसंबंधात दुरावा निर्माण केला हे मात्र निश्चित.