शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कोरोनाने निर्माण केला शेजारधर्म व नातेसंबंधात दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

केशोरी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक संचारबंदी घोषित करून घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर ...

केशोरी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक संचारबंदी घोषित करून घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरू करण्यात आले होते. परत मार्च-एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले व शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाचा संसर्ग दिसून आला. त्यामुळे परत राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे शेजारधर्म आणि नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊन सासूरवाशिणीला माहेराला मुकावे लागले आहे. तर विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला मुकावे लागले. असा अनर्थ कोरोना विषाणूने केल्याचे या वर्षीही अनुभवास आले आहे.

कोरोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोरोनाने एकाकी जीवन जगावे हे शिकविले आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शहराशहरांतून संसर्ग वाढलेला दिसून आला होता. मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील गावागावांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले. यामुळे भयावह परिस्थिती पाहावयास मिळाली. या वैश्विक महामारीने गावातील चालते बोलते व्यवहार ठप्प झाले. एवढेच नव्हे तर शेजारी-शेजारी नातेवाईक व मित्र परिवार कोरोनाच्या भीतीने एकमेकांपासून दूर राहू लागले. कोणीही एकमेकांच्या घरी जात नाही. चुकून एखाद्या वेळेस जाण्याचा प्रसंग आलाच तर चक्क आमच्या घरी येऊ नका, असेही शब्द ऐकविण्यात आले आहेत. घराचे दार बंद करून घरातच राहणे, तोंडाला रुमाल बाधून एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नातून दुरावा जाणवत आहे. एकमेकांविषयी असलेली आपुलकी कोरोना विषाणूने कमी झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या जवळील नातेसंबंधातील मंडळीनेसुद्धा एकमेकांच्या घरी जाणे बंद केले. भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवनात आदरातिथ्याला अत्यंत महत्त्व दिले असले तरीही कोरोनाकाळात संस्कृती व परंपरा दूर सारल्या गेल्या. कोरोना विषाणूने शेजारधर्म व नातेसंबंधात दुरावा निर्माण केला हे मात्र निश्चित.