शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाडीपारची स्थिती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:32 IST

भाडीपार येथील तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. डेंग्युसदृश

‘तो’ ताप डेंग्युचा नाही : दूषित पाण्याचा परिणाम, रूग्णसंख्या १८ वर सालेकसा : भाडीपार येथील तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. डेंग्युसदृश तापामुळे दोघांचे मृत्यू झाल्याने दहशत पसरली होती. परंतू दूषित पाण्याने तापाची साथ पसरल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गावात तीटकनाशक फवारणी व पाण्यात जंतनाशक औषधी टाकण्यात आले आहे. भाडीपार येथे अज्ञात आजारामुळे एका १६ वर्षीय मुलासह ५६ वर्षीय महिलेचा जीव गेला. शिवाय गावातील अन्य काही लोकांना ताप आला. यामुळे डेंग्यूच्या भितीत गावकरी वावरत होते. शिवाय चार रूग्णांना गोंदियाच्या केटीएस रूग्णालयात व अन्य काहींना येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेत सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आपल्या पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी गावातील २७० लोकांची आरोग्य तपासणी करून ९० लोकांचे रक्तनमूने घेत तपासणीसाठी पाठविले आहेत. शिवाय त्यांच्यावर औषधोपचार सुरू असल्याने स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यातच ग्रामीण रूग्णालयात डॉ. संदीप खोब्रागडे यांनी ९४ रूग्णांची तपासणी करीत उपचार केला. यात ११ रूग्ण भरतीे असतानाच आणखी तिघांना दाखल करण्यात आले. गोंदियातील केटीएस रूग्णालयात चार रूग्ण भरती असून रुग्णसंख्या १८ झाली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी धावपळ ४सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जे.डी.चाटे यांना विचारणा केली असता, गावकऱ्यांनी दूषीत पाण्याचा वापर केल्याने तसेच गावात घाण वाढल्यामुळे तापाची साथ पसरली असल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पूर्ण गावात किटकनाशक व औषधांची फवारणी करण्यात आली. तसेच पाण्याला शुद्ध करण्यासाठी विहीर व बोअरवेलमध्ये जंतनाशक औषधी टाकण्यात आली आहे. त्यामुळे आजाराची लागण थांबली आहे. तरीही आरोग्य कर्मचारी गावात सतत लोकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. कुणालाही ताप, डोकेदुखी, पोट दुखी झाल्यास त्वरीत औषधोपचार दिला जात असल्याचे सांगीतले. खासदार व आमदारांनी दिली गावाला भेट ४या प्रकरणाची माहिती मिळताच खासदार अशोक नेते व आमदार संजय पुराम यांनी गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी मृतांच्या घरी भेट देत कुटूंबीयांना धीर दिला. तसेच गावातील परिस्थितीबाबत आरोग्य विभागाकडून जाणून घेत योग्य ते पाऊल उचलण्यास सांगीतले. त्याचप्रकारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर निमगडे यांनीही भेट देत परिस्थिती जाणून घेतली.