शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:19 IST

अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा समाज अन्यायच सहन करीत आहे. लढा लढतच आहे. पण शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.कुंभिटोला-बाराभाटी येथे हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सामुहिक विवाह सोहळ््याचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने अमरावतीचे इंजि. बी.टी. राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त बी.के. गावराने, माजी आ. रामरतन राऊत, मीना राऊत, डॉ. नामदेव किरसान, श्रावण राणा, डॉ. देवकुमार राऊत, गिरीश पालीवाल, तहसीलदार सी.आर. भंडारी, राजेश नंदागवळी, शेषराव कोरेटी, मनोहर चंद्रिकापुरे, अजय कोठेवार, किशन मानकर, वाय.सी. भोयर, प्रशांत भस्मे, लक्ष्मीकांत धानगाये, किशोर तरोणे, सुरेखा नाईक, पद्मा राठोड, महेंद्र जुगणाके, रत्नदीप दहिवले, अनिल दहिवले, करूणा नांदगावे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले यांनी, शासनाने योजना काढल्या, पण रितसर राबविल्या नाही. सामाजिक न्याय व सलोखा राखण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केले. पण तो अधिकार, तो न्याय कधीच आदीवासी समाजाला मिळत नाही. हीच परिस्थिती देशासह राज्यात आहे. अनेक विभागात भ्रष्टाचार सुरू आहेत, पण शासनाचे लक्ष नाही, असे सांगीतले.तसेच या वेळी ना. राजकुमार बडोले, चंद्रिकापुरे, दहिवले, श्रावण राणा, राजेश नंदागवळी, गिरीश पालीवाल, रामरतन राऊत, डॉ. नामदेव किरसान, सहेषराम कोरेटी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तानेश ताराम यांनी मांडले. संचालन करून आभार मोहन औरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुलाराम मारगाये, श्यामलाल चर्जे, नरहरी ताराम, रामू औरासे, वासुदेव औरासे, लिलाधर ताराम, हरिभाऊ नाईक, बब्बू भंडारी, मोहन नाईक, प्रधान यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.सामूहिक विवाह सोहळ्याचे २० वे वर्षसदर सामूहिक विवाह सोहळ्याचे हे २० वर्ष आहे. कुंभिटोला-बाराभाटी येथील हलबा-हलबी समाज संघटनेच्या शाखेने सदर सोहळ्याचे आयोजन करून २० वर्षांपासूनची ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, वैवाहिक सोयीसुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.२७ जोडपी परिणयबद्धसुरूवातीला आदिवासींच्या दैवतांचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. वर-वधूंचा परिचय करून देण्यात आला. काही चिमुकल्यांनी गोंडी नृत्य सादर केले. संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला. अशा मनोरम वातावरणात २७ जोडपी परिणयबद्ध झाली. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आले.