शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:19 IST

अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा समाज अन्यायच सहन करीत आहे. लढा लढतच आहे. पण शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.कुंभिटोला-बाराभाटी येथे हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सामुहिक विवाह सोहळ््याचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने अमरावतीचे इंजि. बी.टी. राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त बी.के. गावराने, माजी आ. रामरतन राऊत, मीना राऊत, डॉ. नामदेव किरसान, श्रावण राणा, डॉ. देवकुमार राऊत, गिरीश पालीवाल, तहसीलदार सी.आर. भंडारी, राजेश नंदागवळी, शेषराव कोरेटी, मनोहर चंद्रिकापुरे, अजय कोठेवार, किशन मानकर, वाय.सी. भोयर, प्रशांत भस्मे, लक्ष्मीकांत धानगाये, किशोर तरोणे, सुरेखा नाईक, पद्मा राठोड, महेंद्र जुगणाके, रत्नदीप दहिवले, अनिल दहिवले, करूणा नांदगावे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले यांनी, शासनाने योजना काढल्या, पण रितसर राबविल्या नाही. सामाजिक न्याय व सलोखा राखण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केले. पण तो अधिकार, तो न्याय कधीच आदीवासी समाजाला मिळत नाही. हीच परिस्थिती देशासह राज्यात आहे. अनेक विभागात भ्रष्टाचार सुरू आहेत, पण शासनाचे लक्ष नाही, असे सांगीतले.तसेच या वेळी ना. राजकुमार बडोले, चंद्रिकापुरे, दहिवले, श्रावण राणा, राजेश नंदागवळी, गिरीश पालीवाल, रामरतन राऊत, डॉ. नामदेव किरसान, सहेषराम कोरेटी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तानेश ताराम यांनी मांडले. संचालन करून आभार मोहन औरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुलाराम मारगाये, श्यामलाल चर्जे, नरहरी ताराम, रामू औरासे, वासुदेव औरासे, लिलाधर ताराम, हरिभाऊ नाईक, बब्बू भंडारी, मोहन नाईक, प्रधान यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.सामूहिक विवाह सोहळ्याचे २० वे वर्षसदर सामूहिक विवाह सोहळ्याचे हे २० वर्ष आहे. कुंभिटोला-बाराभाटी येथील हलबा-हलबी समाज संघटनेच्या शाखेने सदर सोहळ्याचे आयोजन करून २० वर्षांपासूनची ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, वैवाहिक सोयीसुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.२७ जोडपी परिणयबद्धसुरूवातीला आदिवासींच्या दैवतांचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. वर-वधूंचा परिचय करून देण्यात आला. काही चिमुकल्यांनी गोंडी नृत्य सादर केले. संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला. अशा मनोरम वातावरणात २७ जोडपी परिणयबद्ध झाली. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आले.