शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

कार्यमुक्त कंत्राटी एएनएमचे साखळी उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:41 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते.

ठळक मुद्देमागण्या मार्गी लावा : विविध संघटनांचा पाठिंबा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते. दरम्यान रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होत; मात्र आता तीन वर्षांचा काळ लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही.या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएम अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. मात्र यश न आल्याने त्यांनी सोमवारपासून (दि.४) जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या उपोषणाला कास्ट्राईब कर्मचारी संघटना व शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. आता तरी जिल्हा परिषद प्रशासन न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील तीन वर्षांपासून कामावर रूजू होण्याच्या प्रतीक्षेत ४० हून अधिक बेरोजगार कंत्राटी एएनएम सातत्याने जिल्हा परिषदेच्या चकरा मारत होत्या. दरम्यान त्यांनी जि.प. चे पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र मागील तीन वर्षांपासून त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर, वर्षा खोब्रागडे, कल्पना बन्सोड, ललिता भोंगाडे, योगेश्वरी सव्वालाखे, माधुरी खेळकर, नीता ढवळे, ममता तितिरमारे, रूपाकुमारी चौधरी, भाग्यश्री झिंगरे, शोभा ठाकरे, प्राची वानखेडे यांचा समावेश आहे.अनेक पदाधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेटसदर कार्यमुक्त एएनएम यांच्या उपोषणस्थळी जिल्ह्यातील अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी भेट देवून आपला पाठिंबा दर्शवित आहे. गुरूवारी (दि.७) माजी आमदार दिलीप बन्सोड, बहुजन एम्पॉईज संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, डॉ.डी.बी. डहाट, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे संजय टेंभरे आदी मान्यवरांनी सदर उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर मान्यवरांच्या उपस्थितीत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर कार्यमुक्त कंत्राटी एएनएम यांचे समायोजन करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.