शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

प्रवेशाची अनैसर्गिक स्पर्धा सुरू

By admin | Updated: June 28, 2015 01:14 IST

सन २०१५-१६ या वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे शाळांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल शहराकडेगोंदिया : सन २०१५-१६ या वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे शाळांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. पटसंख्येपेक्षा अधिकचा प्रवेश दिला जातो. त्यामुळे त्या वर्गात बसण्यास विद्यार्थ्यांना जागा राहात नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळेत धाव घेत असल्याने शहरात प्रवेश घेण्याची अडचण तर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची वाणवा अशी समस्या निर्माण झाली आहे.शहरात चांगले शिक्षण मिळते याच धारणेतून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळेत आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी धाव घेतो. त्यामुळे शहरात प्रवेशाची अनैसर्गीक स्पर्धा सुरू होते. शहरातील शाळाांत निर्माण होत असलेली गर्दी रोखण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना यावर आळा घालण्यासंदर्भात पत्र दिले आहे. शहराकडे प्रवेशासाठी धाव असते मात्र ग्रामीण भागातील तुकड्यांतील प्रवेश क्षमता पुर्ण होत नाही. शहरातील शाळांनी प्रवेश देताना इतर शाळांच्या प्रवेशाचा विचार करूनच प्रवेश द्यावा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रातून सूचविले आहे. क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश द्यायचे असल्यास त्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दोन हजार विद्यार्थी अधिक पास झाले. परंतु त्यांना प्रत्येक शाळेत २० विद्यार्थी प्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकही अतिरिक्त होणार नाही. (तालुका प्रतिनिधी)ग्रामीण भागांतही इंग्रजीचे ‘फॅड’ कुऱ्हाडी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागांतही इंग्रजी शिक्षणाचे ‘फॅड’ दिसून येत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे दिसून येत आहे. इंग्रजी शिक्षणाने मराठी शाळांवर गाज पाडली आहे. सर्वांनाच आपली मुले फाडफाड इंग्रजी बोलणारी हवी अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच आपल्या मुलांना इंग्रजी ़शिक्षण झेपणार की नाही याकडे लक्ष न देता साधारण कुटुंबातील पालक वर्ग सुद्धा आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत न शिकविता इंग्रजी शाळेत शिकविण्याची ईच्छा व्यक्त करीत आहे. त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी संस्थाचालकांनी गावागावांत कॉन्व्हेंट उघडल्या आहेत. कुऱ्हाडी, कवलेवाडा, चोपा, कालीमाटी, गणखैरा, गिधाडी, मुंडीपार या गावातही कॉन्व्हेंट पोहचल्या असून पालकांना आकर्षित करीत आहेत. परिणामी त्यामुळे गावातील प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या आहेत. पाच विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक अशी काही शाळांची स्थिती झाली आहे. शासकिय कर्मचारी आपल्या पाल्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवित आहेत. त्यामुळे हायस्कुलच्या विद्यार्थी संस्खेतही घट झाली असून काही तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशात जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमध्ये शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता व कॉन्व्हेंटच्या शिक्षणाऐवजी गावातील शाळेत शिकविण्याची मानसिकता पालकांच्या मनात येणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)