शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंड कंपन्यांविरोधात ग्राहकांचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:27 IST

चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक जे.एम.हायस्कूल छोटा पाल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देकंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक जे.एम.हायस्कूल छोटा पाल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शहराच्या मुख्य मार्गावरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील प्रवेशव्दारासमोर ठिय्या देवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. भंडारा, नागपूर, बालाघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यातील २० ते २५ हजार ग्राहकांचा विविध चिटफंड कंपण्यांनी हडपला आहे. त्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. चिटफंड कंपन्याकडून ग्राहकांची होणारी दिशाभूल बंद करुन ग्राहकांनी विविध चिटफंड कंपन्यामध्ये गुंतविलेला पैसा परत मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किशोर मेश्राम, प्रेम मांद्रे, दिनेशकुमार राणे, अरूणकुमार फुंडे, लखन कटरे, हुकेश लिल्हारे, उमेश बिसेन, तेजेवर पटले, डिलेश्वर पटले, लक्ष्मी कटरे, शोभा चौरीवार, रेवेंद्र टेंभरे, गजानन पटले, शिवकुमार पाथोडे, ज्ञानचंद बैठवार, मनोज चुटे, राजेश बडोले, ग्यानिराम डोये यांनी केले.