शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सूर्याटोलातील बांध तलावाचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:11 IST

शहराच्या सुर्याटोला परिसरातील बांध तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने ९० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देसौंदर्यीकरणासाठी ९० लाख रूपये मंजूर : आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांचे फलित

ऑनलाईन लोकमतगोंदिया : शहराच्या सुर्याटोला परिसरातील बांध तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीने ९० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधी अंतर्गत लवकरच निविदा प्रक्रीया पूर्ण करून तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याचे आदेश राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ३ मार्च रोजी दिले आहे. यामुळे बांध तलावाचे सौंदर्यीकरण होणार असून बांध तलावाचे रूप पालटणार आहे.बांध तलावात मोठ्या प्रमाणात गाळ भरलेला असल्यामुळे, तलावाची दुरूस्ती न झाल्यामुळे व तलावातील बहुतांश भागात अतिक्रमण करण्यात आल्याने पावसाळ््यात तलावाचा पाणी रस्त्यावर येत होते. अशात सुर्याटोला, टी.बी.टोली, प्रोफेसर कॉलनी, महावीर कॉलनी परिसरात पाणी भरत होते.याचे परिणाम रिंग रोड पासून गजानन कॉलनी व अरिहंत कॉलनीतही बघावयास मिळत होते. दरवर्षीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडून चार कोटींचा निधी मंजूर करवून एन.एम.डी.कॉलेज-रिंग रोड- रेल्वे क्रॉसिंगच्या पूर्ण नाल्याचे सिमेंटीकरण करवून घेतले. यामुळे पावसाळ््यातील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली होती. मात्र सन २०१३ मधील पावसामुळे या परिसरात पुन्हा पाणी भरले होते.याकडे लक्ष देत आमदार अग्रवाल यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांकडून परिसराचे सर्वेक्षण करवून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगीतले होते.तसेच विभागाचा सल्ला घेऊन राज्य शासनाच्या पुर दुरूस्ती व रोकथाम कार्यक्रमांतर्गत ६० लाख रूपयांच्या निधीतून तलावाचे खोलीकरण व पाळीची दुरूस्ती करवून घेतली.मात्र या तलावाचे सौंदर्यीकरण व्हावे अशी परिसरातील जनता व खुद्द आमदार अग्रवाल यांची इच्छा असल्याने त्यांनी बांध तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी सन २०१४ मध्येच ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता.मात्र जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून निविदा प्रक्रीया वेळेत पूर्ण करता आली नाही. यातच आर्थिक वर्ष सरल्याने शासनाने नियमानुसार निधी पुढील वर्षी खर्च करण्यावर बंदी लावून निधी परत करण्याचे निर्देश दिले होते.अशात बांध तलावाच्या सौंदर्यीकरणाचे सुर्याटोलावासीयांचे व आमदार अग्रवाल यांचे स्वप्न अधुरे राहिले असते. मात्र नागरिकांना शुद्ध हवा मिळावी काही वेळ निवांत घालविता यावे यासाठी आमदार अग्रवाल यांनी बांध तलावाचा हा विषय पुन्हा रेटून धरला.यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांपासून राज्य सरकारस्तरावर प्रयत्न करून ९० लाख रूपयांचा निधी सन २०१७-१८ मध्ये निविदा प्रक्रीया पूर्ण करून खर्च करण्याचे आदेश शासनाकडून आणले.त्यामुळे आता लवकरच निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यावर बांध तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू होऊन बांध तलावाचे रूप येत्या काळात पालटणार आहे.सौंदर्यीकरणात होणार ही कामेबांध तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत तलावाची पाळ कापली जावू नये यासाठी पिचींग केली जाणार आहे. या पाळीवर नागरिकांना फिरता यावे यासाठी पाथवे तयार केला जाईल. शिवाय पाळीवर भरपूर प्रमाणात प्रकाशाची व्यवस्था रहावी यासाठी स्ट्रीटलाईट तसेच नागरिकांच्या बसण्यासाठी आरामखुर्ची लावण्यात येणार आहे. या सोबतच शेडचे बांधकाम केले जाणार असून फव्वारेही लावले जाणार आहे. तसेच तलावातील पाण्याची निकासी व्हावी यासाठी ओवरफ्लो चॅनल तयार केले जाईल.