शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 20:45 IST

दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बांधकामातील साहित्य निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे. तर बंधाऱ्याचे बांधकाम करताना त्यात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी देखील घेतली जात नसल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आला आहे.परसवाडा येथे छगन मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ नाला असून या नाल्यावर गोंदिया लघू सिंचन विभागातर्फे बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकाम मरस्कोल्हे यांची तीन आर जागा गेली. मात्र याची माहिती मरस्कोल्हे यांना नव्हती. त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांना याचा धक्का बसला व २६ मे रोजी या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बंधारा बांधकामात वापरल्या जाणाºया साहित्यावर सुध्दा शंका निर्माण झाली आहे. बंधाºयाचे बांधकाम करताना माती खोदून झाल्यानंतर ८ एमएम दगडांची पीचिंग केली जाते. नंतर ४० एमएम गिट्टीची १ फूट लेयर देऊन लोखंडी जाळी १० एमएम लोखंड बांधून २० एमएम गिट्टीचे सिमेंट क्रांकीट टाकून लेयर टाकले जाते.भिंत तयार करताना जाळी तयार करुन रिंगाची जाळी तयार १० एमएम लोखंडाने करणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकातील निकषांप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप आहे. बांधकामात वापरले जाणारे दगड, लोखंड तसेच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साहित्याची गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.नाल्याच्या ठिकाणी बंधाऱ्याची भिंतज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यालगतच भिंत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी कुठून जाणार, पावसाळ्याच्या दिवसात हेच पाणी शेतकºयांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याचे बांधकाम पेटी कंत्राट पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे. या बंधाºयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास येवून देखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.उपसरपंचांच्या तक्रारीकडे दुर्लक्षयेथील बंधारा बांधकाम वापरल्या जात असलेल्या साहित्याबाबत उपसरपंच राकेश वैद्य यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केली. मात्र यानंतरही साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हेतूपुरस्पर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. तर खैरलांजी, परसवाडा, अर्जुनी या गावातील कामे जि.प.लघुसिंचन उपविभाग तिरोडा अंतर्गत सुरू आहे. यासर्व कामांची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच राकेश वैद्य, मोहन तितिरमारे, प्रतिभा टेंभुर्णीकर, उषा बोपचे यांनी केली आहे.बांधकामावर बालमजूरपरसवाडा येथे सुरू असलेल्या बंधारा बांधकामावर बाल मजुरांचा वापर केला जात आहे. नियमानुसार बाल कामगारांना कामावर ठेवता येत नसून याची सुध्दा तक्रार गावकºयांनी संबंधित विभागाकडे केली. मात्र त्यांनी याकडे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.