शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 20:45 IST

दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बांधकामातील साहित्य निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे. तर बंधाऱ्याचे बांधकाम करताना त्यात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी देखील घेतली जात नसल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आला आहे.परसवाडा येथे छगन मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ नाला असून या नाल्यावर गोंदिया लघू सिंचन विभागातर्फे बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकाम मरस्कोल्हे यांची तीन आर जागा गेली. मात्र याची माहिती मरस्कोल्हे यांना नव्हती. त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांना याचा धक्का बसला व २६ मे रोजी या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बंधारा बांधकामात वापरल्या जाणाºया साहित्यावर सुध्दा शंका निर्माण झाली आहे. बंधाºयाचे बांधकाम करताना माती खोदून झाल्यानंतर ८ एमएम दगडांची पीचिंग केली जाते. नंतर ४० एमएम गिट्टीची १ फूट लेयर देऊन लोखंडी जाळी १० एमएम लोखंड बांधून २० एमएम गिट्टीचे सिमेंट क्रांकीट टाकून लेयर टाकले जाते.भिंत तयार करताना जाळी तयार करुन रिंगाची जाळी तयार १० एमएम लोखंडाने करणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकातील निकषांप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप आहे. बांधकामात वापरले जाणारे दगड, लोखंड तसेच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साहित्याची गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.नाल्याच्या ठिकाणी बंधाऱ्याची भिंतज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यालगतच भिंत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी कुठून जाणार, पावसाळ्याच्या दिवसात हेच पाणी शेतकºयांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याचे बांधकाम पेटी कंत्राट पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे. या बंधाºयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास येवून देखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.उपसरपंचांच्या तक्रारीकडे दुर्लक्षयेथील बंधारा बांधकाम वापरल्या जात असलेल्या साहित्याबाबत उपसरपंच राकेश वैद्य यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केली. मात्र यानंतरही साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हेतूपुरस्पर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. तर खैरलांजी, परसवाडा, अर्जुनी या गावातील कामे जि.प.लघुसिंचन उपविभाग तिरोडा अंतर्गत सुरू आहे. यासर्व कामांची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच राकेश वैद्य, मोहन तितिरमारे, प्रतिभा टेंभुर्णीकर, उषा बोपचे यांनी केली आहे.बांधकामावर बालमजूरपरसवाडा येथे सुरू असलेल्या बंधारा बांधकामावर बाल मजुरांचा वापर केला जात आहे. नियमानुसार बाल कामगारांना कामावर ठेवता येत नसून याची सुध्दा तक्रार गावकºयांनी संबंधित विभागाकडे केली. मात्र त्यांनी याकडे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.