शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 20:45 IST

दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बांधकामातील साहित्य निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे. तर बंधाऱ्याचे बांधकाम करताना त्यात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी देखील घेतली जात नसल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आला आहे.परसवाडा येथे छगन मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ नाला असून या नाल्यावर गोंदिया लघू सिंचन विभागातर्फे बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकाम मरस्कोल्हे यांची तीन आर जागा गेली. मात्र याची माहिती मरस्कोल्हे यांना नव्हती. त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांना याचा धक्का बसला व २६ मे रोजी या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बंधारा बांधकामात वापरल्या जाणाºया साहित्यावर सुध्दा शंका निर्माण झाली आहे. बंधाºयाचे बांधकाम करताना माती खोदून झाल्यानंतर ८ एमएम दगडांची पीचिंग केली जाते. नंतर ४० एमएम गिट्टीची १ फूट लेयर देऊन लोखंडी जाळी १० एमएम लोखंड बांधून २० एमएम गिट्टीचे सिमेंट क्रांकीट टाकून लेयर टाकले जाते.भिंत तयार करताना जाळी तयार करुन रिंगाची जाळी तयार १० एमएम लोखंडाने करणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकातील निकषांप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप आहे. बांधकामात वापरले जाणारे दगड, लोखंड तसेच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साहित्याची गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.नाल्याच्या ठिकाणी बंधाऱ्याची भिंतज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यालगतच भिंत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी कुठून जाणार, पावसाळ्याच्या दिवसात हेच पाणी शेतकºयांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याचे बांधकाम पेटी कंत्राट पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे. या बंधाºयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास येवून देखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.उपसरपंचांच्या तक्रारीकडे दुर्लक्षयेथील बंधारा बांधकाम वापरल्या जात असलेल्या साहित्याबाबत उपसरपंच राकेश वैद्य यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केली. मात्र यानंतरही साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हेतूपुरस्पर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. तर खैरलांजी, परसवाडा, अर्जुनी या गावातील कामे जि.प.लघुसिंचन उपविभाग तिरोडा अंतर्गत सुरू आहे. यासर्व कामांची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच राकेश वैद्य, मोहन तितिरमारे, प्रतिभा टेंभुर्णीकर, उषा बोपचे यांनी केली आहे.बांधकामावर बालमजूरपरसवाडा येथे सुरू असलेल्या बंधारा बांधकामावर बाल मजुरांचा वापर केला जात आहे. नियमानुसार बाल कामगारांना कामावर ठेवता येत नसून याची सुध्दा तक्रार गावकºयांनी संबंधित विभागाकडे केली. मात्र त्यांनी याकडे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.