शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

सिंचनासाठी १३ हजार विहिरींचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:16 IST

विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भाला उद्दिष्ट : वर्षभरात करावे लागणार बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे सिंचन क्षमतेत काही प्रमाणात वाढ करण्यास मदत झाली. तसेच भूजल पातळीत वाढ झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा शासनातर्फे केला जात आहे.यापाठोपाठ आता शासनाने धडक सिंचन कार्यक्रमातंर्गत रोहयोच्या माध्यमातून विहिरी बांधकाचे नियोजन केले आहे. पूर्व विदर्भात जवळपास १२ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर रब्बी हंगामात सुध्दा ४ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते.मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकरी संकटात आले. सिंचनाअभावी शेतकºयांना रब्बी आणि उन्हाळी पीक घेता आले नाही.त्यामुळे राज्य शासनाच्या रोहयो विभागाने पूर्व विदर्भात १३ हजार विहिरी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच प्रशासकीय खर्चासाठी ४ कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली आहे. २० जून २०२० पर्यंत विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. विशेष मागील वर्षी दिलेले उद्दिष्ट गाठण्यात या विभागाला यश आले नव्हते. त्यामुळे नव्याने १३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे.