शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सिंचनासाठी १३ हजार विहिरींचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:16 IST

विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भाला उद्दिष्ट : वर्षभरात करावे लागणार बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे सिंचन क्षमतेत काही प्रमाणात वाढ करण्यास मदत झाली. तसेच भूजल पातळीत वाढ झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा शासनातर्फे केला जात आहे.यापाठोपाठ आता शासनाने धडक सिंचन कार्यक्रमातंर्गत रोहयोच्या माध्यमातून विहिरी बांधकाचे नियोजन केले आहे. पूर्व विदर्भात जवळपास १२ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर रब्बी हंगामात सुध्दा ४ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते.मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकरी संकटात आले. सिंचनाअभावी शेतकºयांना रब्बी आणि उन्हाळी पीक घेता आले नाही.त्यामुळे राज्य शासनाच्या रोहयो विभागाने पूर्व विदर्भात १३ हजार विहिरी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच प्रशासकीय खर्चासाठी ४ कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली आहे. २० जून २०२० पर्यंत विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. विशेष मागील वर्षी दिलेले उद्दिष्ट गाठण्यात या विभागाला यश आले नव्हते. त्यामुळे नव्याने १३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे.