शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जिल्ह्यात होणार १३ हजार शौचालयांचे बांधकाम

By admin | Updated: October 9, 2014 23:04 IST

देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या

गोंदिया : देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या बांधकामांना सुरूवात झालेली आहे. यासाठी ५१ गावांची निवड सन २०१३-१४ मध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातून देण्यात आली आहे.गावांच्या विकासावरच देशाचा विकास निर्भर आहे. परंतु ग्रामीण भागात शासनाच्या योजना विलंबाने पोहचत असल्यामुळे गावकरी वेळेवर त्या योजनांचा लाभ घेवू शकत नाही. ग्रामीण भागात ६० टक्के नागरिक उघड्या परिसरात शौचविधीसाठी जातात. त्याच परिसरात खताचे खड्डे खोदून जनावरांचे मलमूत्र संग्रहीत केले जाते. त्यामुळे तेथे पिण्याचे पाणी दूषित होते. दूषित पाणी पिण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होवू लागतो. या प्रकारामुळेच अधिक प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो. या बाबीला गांभीर्याने घेवून शासनाद्वारे गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प घेत निर्मल भारत अभियानाची योजना अमलात आणण्यात आली. सदर योजनेंतर्गत लाभार्थी गावांची निवड करून त्या गावांत शौचालयांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५१ गावांना १३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देवून शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरूवात करून सन २०१४ च्या शेवटपर्यंत शौचालयांचे बांधकाम केले जाईल. सदर अभियानाची सुरूवात एप्रिल २०१२ पासून करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सन २०२२ पर्यंत देश हागणदारीमुक्त होईल. त्यासाठी निर्मल भारत अभियानाच्या वतीने कार्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शौचालयांचा लाभ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारेच नव्हे तर इतर महिला परिवार प्रमुख, अपंग कुटूंब प्रमुख, भूमिहिन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थी निवडीचे कार्य केले जाईल.