शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

जिल्ह्यात होणार १३ हजार शौचालयांचे बांधकाम

By admin | Updated: October 9, 2014 23:04 IST

देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या

गोंदिया : देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या बांधकामांना सुरूवात झालेली आहे. यासाठी ५१ गावांची निवड सन २०१३-१४ मध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातून देण्यात आली आहे.गावांच्या विकासावरच देशाचा विकास निर्भर आहे. परंतु ग्रामीण भागात शासनाच्या योजना विलंबाने पोहचत असल्यामुळे गावकरी वेळेवर त्या योजनांचा लाभ घेवू शकत नाही. ग्रामीण भागात ६० टक्के नागरिक उघड्या परिसरात शौचविधीसाठी जातात. त्याच परिसरात खताचे खड्डे खोदून जनावरांचे मलमूत्र संग्रहीत केले जाते. त्यामुळे तेथे पिण्याचे पाणी दूषित होते. दूषित पाणी पिण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होवू लागतो. या प्रकारामुळेच अधिक प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो. या बाबीला गांभीर्याने घेवून शासनाद्वारे गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प घेत निर्मल भारत अभियानाची योजना अमलात आणण्यात आली. सदर योजनेंतर्गत लाभार्थी गावांची निवड करून त्या गावांत शौचालयांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५१ गावांना १३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देवून शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरूवात करून सन २०१४ च्या शेवटपर्यंत शौचालयांचे बांधकाम केले जाईल. सदर अभियानाची सुरूवात एप्रिल २०१२ पासून करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सन २०२२ पर्यंत देश हागणदारीमुक्त होईल. त्यासाठी निर्मल भारत अभियानाच्या वतीने कार्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शौचालयांचा लाभ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारेच नव्हे तर इतर महिला परिवार प्रमुख, अपंग कुटूंब प्रमुख, भूमिहिन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थी निवडीचे कार्य केले जाईल.