शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

विद्यार्थ्यांची ईबीसी सवलत बंद पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: May 21, 2017 01:55 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक (प्र.क्र.-२२१ इबीसी-२०१६ दिनांक ३१ मार्च २०१६) अन्वये

लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक (प्र.क्र.-२२१ इबीसी-२०१६ दिनांक ३१ मार्च २०१६) अन्वये शासनाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात पदविका अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी ईबीसी सवलतीसाठी पात्र असतात. शासनाचे असे स्पष्ट परिपत्रक असूनसुद्धा तंत्रशिक्षण संचालनालय विभागाकडून विद्यार्थ्यांना सवलतीपासून वंचित केले जात आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. साखरीटोला येथील विद्यार्थी मोहितकुमार संतोष अग्रवाल याने बारावीनंतर सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रात लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलीटेक्निक आमगाव येथे थेट द्वितीय वर्षात मॅकेनिकल शाखेत प्रवेश घेतला होता. ईबीसी सवलतीकरिता लागणारे सर्व कागदपत्र त्याने सादर केले होते. त्यास द्वितीय वर्षात इबीसी सवलत मिळाली, परंतु तृतीय वर्षात परीक्षेचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याची ईबीसी सवलत रद्द करण्यात आल्याची सूचना विद्यालयाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांचे पालक ईबीसी सवलतीकरिता पात्र असतानासुध्दा अचानक सवलत रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्याच्या पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ते विद्यालयाची फीस भरून मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. तसेच प्रद्युम्न संतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने बारावीनंतर याच महाविद्यालयात शासनाच्या प्रक्रियेनुसार डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरींगच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतला आहे. शासन नियमानुसार इबीसी सवलत मिळण्याचे सर्व कागदपत्रे त्याने विद्यालयात सादर केले आहेत. मात्र सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय नागपूर यांनी सदर अर्जावर सवलत देण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. संजय पुराम व सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय नागपूर यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. तसेच पालकांनी नागपूर कार्यालयात जाऊन सहसंचालक ठाकरे यांची भेट घेतली व आपली परिस्थिती सांगितली. पण अजूनपर्यंत ईबीसी सवलतीचे समाधान काढण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी मिळून इबीसी सवलतीबाबत विद्यार्थ्यांचे समाधान काढावे अन्यथा असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वरित समाधान करण्याची मागणी संतोष अग्रवाल, रमेश चुटे, प्रा. सागर काटेखाये, डॉ. संजय देशमुख, सुनील अग्रवाल, प्रभाकर दोनोडे, डॉ. अजय उमाटे, पृथ्वीराज शिवणकर, प्रदीप अग्रवाल, सजय कुसराम, भुमेश्वर मेंढे, शामलाल दोनोडे यांनी केली आहे.