शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची ईबीसी सवलत बंद पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: May 21, 2017 01:55 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक (प्र.क्र.-२२१ इबीसी-२०१६ दिनांक ३१ मार्च २०१६) अन्वये

लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक (प्र.क्र.-२२१ इबीसी-२०१६ दिनांक ३१ मार्च २०१६) अन्वये शासनाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात पदविका अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी ईबीसी सवलतीसाठी पात्र असतात. शासनाचे असे स्पष्ट परिपत्रक असूनसुद्धा तंत्रशिक्षण संचालनालय विभागाकडून विद्यार्थ्यांना सवलतीपासून वंचित केले जात आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. साखरीटोला येथील विद्यार्थी मोहितकुमार संतोष अग्रवाल याने बारावीनंतर सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रात लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलीटेक्निक आमगाव येथे थेट द्वितीय वर्षात मॅकेनिकल शाखेत प्रवेश घेतला होता. ईबीसी सवलतीकरिता लागणारे सर्व कागदपत्र त्याने सादर केले होते. त्यास द्वितीय वर्षात इबीसी सवलत मिळाली, परंतु तृतीय वर्षात परीक्षेचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याची ईबीसी सवलत रद्द करण्यात आल्याची सूचना विद्यालयाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांचे पालक ईबीसी सवलतीकरिता पात्र असतानासुध्दा अचानक सवलत रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्याच्या पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ते विद्यालयाची फीस भरून मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. तसेच प्रद्युम्न संतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने बारावीनंतर याच महाविद्यालयात शासनाच्या प्रक्रियेनुसार डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरींगच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतला आहे. शासन नियमानुसार इबीसी सवलत मिळण्याचे सर्व कागदपत्रे त्याने विद्यालयात सादर केले आहेत. मात्र सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय नागपूर यांनी सदर अर्जावर सवलत देण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. संजय पुराम व सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय नागपूर यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. तसेच पालकांनी नागपूर कार्यालयात जाऊन सहसंचालक ठाकरे यांची भेट घेतली व आपली परिस्थिती सांगितली. पण अजूनपर्यंत ईबीसी सवलतीचे समाधान काढण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी मिळून इबीसी सवलतीबाबत विद्यार्थ्यांचे समाधान काढावे अन्यथा असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वरित समाधान करण्याची मागणी संतोष अग्रवाल, रमेश चुटे, प्रा. सागर काटेखाये, डॉ. संजय देशमुख, सुनील अग्रवाल, प्रभाकर दोनोडे, डॉ. अजय उमाटे, पृथ्वीराज शिवणकर, प्रदीप अग्रवाल, सजय कुसराम, भुमेश्वर मेंढे, शामलाल दोनोडे यांनी केली आहे.