शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

स्वतंत्र विदर्भ व शेतकरी हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:17 IST

जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली. सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेचा विसर पडला आहे.

 भाजप शेतकरी विरोधी : नितीन राऊत यांची पत्रपरिषदेत माहिती साकोली : जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली. सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी राऊत म्हणाले, ऐन पावसाळ्यात कृषीपंपाचे १६ तासाचे भारनियमन सुरु आहे. त्यामुळे रोवणी खोळंबली असून शेतकऱ्यांना हमी भावही मिळाला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात अशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली असून उद्योगपतींना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी उद्योगपतींचे बुडालेले कर्ज शासकीय तिजोरीतून देत आहेत. ज्या जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली तीच जनता आता पश्चाताप करीत आहे. भाजपने २०१४ ची निवडणूक स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढली. आता केंद्रात व राज्यात त्यांचीच सत्ता आहे. वेगळा विदर्भ का करीत नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, एकीकडे भाजपाचे आमदार व खासदार विदर्भाचा प्रस्ताव आणतात तर दुसरीकडे त्यांचेच मुख्यमंत्री मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे असे सांगून दिशाभूल करतात. विदर्भ वेगळा व्हावा ही काँग्रेसची इच्छा असून आता वेगळा विदर्भ व्हावा यासाठी विदर्भातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यातून सर्वानुमताचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून वेगळ्या विदर्भासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हाननद करंजेकर, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, डॉ.अजय तुमसरे, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, मंदा गणवीर, पंचायत समिती सदस्य छाया पटले, माजी सरपंच हेमलता परसगडे, माजी सभापती क्रिष्णा मेश्राम, माजी सभापती ताराबाई तरजुले आदी अनेक जण उपस्थित होते.