शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

काँग्रेस पदाधिकारी उतरले रस्त्यावर

By admin | Updated: December 1, 2014 22:55 IST

गोंदियासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत काही ठिकाणी मोर्चा काढून तर काही ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन सरकारविरोधातील आवाज

तहसीलदारांना निवेदन : धानाच्या भाववाढीसह शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीगोंदिया : गोंदियासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत काही ठिकाणी मोर्चा काढून तर काही ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन सरकारविरोधातील आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धानाच्या भाववाढीसह इतर काही मागण्या मुख्यमंत्री व राज्यपालांच्या नावे करण्यात आल्या.गोंदिया तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आ.गोपालदास अग्रवाल, तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी भोला भवन येथील काँग्रेस कार्यालयापासून जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.यावेळी मार्गदर्शन करताना आ.गोपालदास अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी केली. याशिवाय जवखेडा येथील दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी पं.स.सभापती कौशल्या बोपचे, उपसभापती चमन बिसेन, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमर वऱ्हाडे, सचिव गेंदलाल शरणागत, कृ.उ.बा. समिती उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक अरुणकुमार दुबे, माजी कृऊबा समिती सभापती धनंजय तुरकर, माजी पं.स.उपसभापती मनिष मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे गोरेगाव, तिरोडा येथेही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या तसेच जवखेडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना पकडून शिक्षा द्यावी याबाबतचे निवेदन तहसीलदार संतोष महाले यांना दिले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी निवेदनकर्त्यांना दिले.राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी अत्यंत संकटात सापडला असून आत्महत्येकडे वळत आहे. दुष्काळग्रस्त व कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तर फळ बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, उत्पादन खर्चावर आधारित धान उत्पादक शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा व दिवसेंदिवस वाढणाऱ्या त्यांच्यावरील कर्जाचा बोझा कमी करावा, सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देवून वीज बील माफ करावे, तसेच जवखेडा येथे दलित समाजाच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना त्वरित पकडून शिक्षा द्यावी, या मागण्यांचा त्यात समावेश होता.यावेळी कार्यकारी अध्यक्ष भागवत नाकाडे, महिला अध्यक्ष विशाखा साखरे, ललीतचंद्र राजाभोज, संजय मानकर, संतोष नरुले, महादेव कन्नाके, कृष्णा शहारे, शांता तलमले, जगदिशसिंह पवार, जगदीश मोहबंशी, लक्ष्मीकांत नाकाडे, नाशिक शहारे, रवि खोटेले, हंसा सोनपिंपळे, अरविंद पालीवाल, लता कापगते, वासुदेव उके, सुखदेव पवार उपस्थित होते. सालेकसाशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सालेकसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या धानाला प्रतिक्विंटल दोन हजार ५०० रूपये हमीभाव द्यावा, ५०० रुपये बोनस द्यावा, रबी व उन्हाळी पिकांसाठी सिरपूर धरणाचे पाणी मिळावे, मनरेगाअंतर्गत कामे त्वरित सुरू करण्यात यावी, बेरोजगारांना रोजगार तसेच बेरोजगारी भत्ता द्यावा, वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करावी, शेतकऱ्यांना मोफत वीज व थकबाकी माफ करावी, शेतीवर कर्ज माफी देण्यात यावी, सर्वत्र शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात यावे तसेच धान खरेदीची मर्यादा हेक्टरी २० क्ंिवटलवर ४० क्विंटल करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री भरत बहेकार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, सचिव यादवलाल बनोटे, लखनलाल अग्रवाल, खेमराज साखरे, विनय शर्मा, देवचंद ढेकवार, अनिल फुंडे आदी कार्यकर्ते व शेकडो शेतकरी सहभागी झाले. तहसील कार्यालयात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शेवटी तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)