शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत

By admin | Updated: June 8, 2014 23:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्‍यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार

मनोज ताजने - गोंदियाविधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्‍यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार झाले आहेत. परंतू आता परिस्थिती बरीच बदलली आहे. काँग्रेसचीच नाही तर सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदार संघावर पकड राहिलेली नाही, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजपची पकड वाढली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना गोंदिया विधानसभा मतदार संघात ८४ हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानला जात होता. यावेळी ही मतांची आघाडी पूर्णपणे संपुष्टात येऊन भाजपच्या नाना पटोले यांनी या मतदार संघातून ५१0७ मतांची आघाडी घेतली. म्हणजेच गतवेळेच्या तुलनेत जवळपास ९0 हजार मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे स्पष्टपणे दिसून येते.हे परिवर्तन एकाएकी झाले किंवा केवळ ‘मोदी लाटे’मुळे झाले असेही म्हणता येणार नाही. साधारण अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवत ४0 पैकी १६ जागा जिंकल्या. शिवसेनेचेही ३ नगरसेवक निवडून आले. याचवेळी राष्ट्रवादीला ११ तर काँग्रेसला अवघ्या ८ जागांवर समाधान मानावे लागले. दोन अपक्ष उमेदवारांच्या मदतीने काँग्रेस-राकाँने नगर परिषदेवर सत्ता काबीज केली असली तरी मतदारांचा कौल भाजपच्या बाजुने झुकल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. त्यानंतरही गोंदिया शहरातील आणि या मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा, विकासात्मक कामांना मार्गी लावण्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून झालेले दुर्लक्ष विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी इमानदारीने काम केले नसल्याची कुजबूज होती. त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.असे असले तरी विरोधकांसाठी ही निवडणूक सोपी आहे असेही नाही. भाजप-सेनेच्या युतीत ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देणार्‍या या मतदार संघाने गेल्या सलग दोन निवडणुकीत पराभवही चाखायला लावला. शिवाय गेल्या पाच वर्षात शिवसेनेने पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही. त्यामुळे भाजप आपली या मतदार संघावरील पकड वाढल्याचा दावा करीत शिवसेनेकडून हा मतदार संघ आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे झाल्यास भाजपकडून या मतदार संघात कोणाला तिकीट मिळेल यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. कारण या मतदार संघात भाजपकडून लढण्यास इच्छुक असणार्‍यांची संख्या जास्त आहे. अशावेळी एखाद्याची नाराजी किंवा बंडखोरी या पक्षाला मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व जर-तरच्या गोष्टी असल्या तरी आजच्या परिस्थिीतीत काँग्रेससाठी या मतदार संघात पोषक वातावरण राहिलेले नाही, हे मात्र मान्य करावेच लागेल.