शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत

By admin | Updated: June 8, 2014 23:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्‍यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार

मनोज ताजने - गोंदियाविधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्‍यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार झाले आहेत. परंतू आता परिस्थिती बरीच बदलली आहे. काँग्रेसचीच नाही तर सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदार संघावर पकड राहिलेली नाही, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजपची पकड वाढली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना गोंदिया विधानसभा मतदार संघात ८४ हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानला जात होता. यावेळी ही मतांची आघाडी पूर्णपणे संपुष्टात येऊन भाजपच्या नाना पटोले यांनी या मतदार संघातून ५१0७ मतांची आघाडी घेतली. म्हणजेच गतवेळेच्या तुलनेत जवळपास ९0 हजार मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे स्पष्टपणे दिसून येते.हे परिवर्तन एकाएकी झाले किंवा केवळ ‘मोदी लाटे’मुळे झाले असेही म्हणता येणार नाही. साधारण अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवत ४0 पैकी १६ जागा जिंकल्या. शिवसेनेचेही ३ नगरसेवक निवडून आले. याचवेळी राष्ट्रवादीला ११ तर काँग्रेसला अवघ्या ८ जागांवर समाधान मानावे लागले. दोन अपक्ष उमेदवारांच्या मदतीने काँग्रेस-राकाँने नगर परिषदेवर सत्ता काबीज केली असली तरी मतदारांचा कौल भाजपच्या बाजुने झुकल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. त्यानंतरही गोंदिया शहरातील आणि या मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा, विकासात्मक कामांना मार्गी लावण्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून झालेले दुर्लक्ष विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी इमानदारीने काम केले नसल्याची कुजबूज होती. त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.असे असले तरी विरोधकांसाठी ही निवडणूक सोपी आहे असेही नाही. भाजप-सेनेच्या युतीत ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देणार्‍या या मतदार संघाने गेल्या सलग दोन निवडणुकीत पराभवही चाखायला लावला. शिवाय गेल्या पाच वर्षात शिवसेनेने पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही. त्यामुळे भाजप आपली या मतदार संघावरील पकड वाढल्याचा दावा करीत शिवसेनेकडून हा मतदार संघ आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे झाल्यास भाजपकडून या मतदार संघात कोणाला तिकीट मिळेल यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. कारण या मतदार संघात भाजपकडून लढण्यास इच्छुक असणार्‍यांची संख्या जास्त आहे. अशावेळी एखाद्याची नाराजी किंवा बंडखोरी या पक्षाला मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व जर-तरच्या गोष्टी असल्या तरी आजच्या परिस्थिीतीत काँग्रेससाठी या मतदार संघात पोषक वातावरण राहिलेले नाही, हे मात्र मान्य करावेच लागेल.