शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने गरिबांना सांभाळण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:18 IST

देशात काँग्रेसने मागील ७० वर्षात सर्व वर्गातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या कित्येक योजना लागू केल्या. गोर-गरीब व समाजातील शेवटच्या टोकावरील नागरिकांसाठी लागू केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सारख्या महत्त्वपूर्ण योजना कित्येकांना आधार देत असून त्या काँग्रेस सरकारचीच देण आहे. कॉँग्रेस पक्षाने गरिबांना सांभाळण्याचे काम केल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम पांढराबोडी येथील वैयक्तिक लाभांचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात काँग्रेसने मागील ७० वर्षात सर्व वर्गातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या कित्येक योजना लागू केल्या. गोर-गरीब व समाजातील शेवटच्या टोकावरील नागरिकांसाठी लागू केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सारख्या महत्त्वपूर्ण योजना कित्येकांना आधार देत असून त्या काँग्रेस सरकारचीच देण आहे. कॉँग्रेस पक्षाने गरिबांना सांभाळण्याचे काम केल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम पांढराबोडी येथे रविवारी (दि.६) आयोजित वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या शिबिरात ते बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, सन २०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनांचे अनुदान वाढवून १ हजार रूपये करण्याची घोषणा केली होती. आता मात्र ५ वर्षे होत असून कॉँग्रेस शासनकाळात मिळत असलेले दरमह ६०० रूपयेच आजही मिळत आहे. त्याचही बहुतांश लाभार्थी या योजनांसाठी लागणारे कागदपत्र जुळविण्यातच असमर्थ ठरतात. अशातही या गरजूपर्यंत योजना पोहचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हे सामाजिक दायीत्व निभाविण्याचे काम प्राधान्याने करावे असे मत व्यक्त केले. उपसरपंच धुरन सुलाखे यांनी, प्रत्येकापर्यंत वैयक्तीक लाभाच्या योजना पोहचविण्यासाठी आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पूर्ण ताकतीने कार्य केले जाणार असल्याचे मत व्यक्त केले.शिबिरात जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, रमेश लिल्हारे, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मंगल सुलाखे, भवरलाल रहांगडाले, राजु गौतम, भूवन नागपुरे, प्रेम मेश्राम, डॉ. योगेश बिसेन, भोजराज चुलपार, प्रमिला करचाल, धुरनलाल सुलाखे, चंद्रकला वघारे, आदर्श गजभिये, लता चन्ने, चंदन गजभिये, भवन नागपुरे, जितेंद्र ढोमणे, कविता मेश्राम, सिमा साखरे, पारबता दमाहे, मुनेश्वरी कवास, नेमीेचंद ढेकवार व गावकरी उपस्थित होते.नागरिकांंच्या समस्या सोडविण्याचे निर्देशया शिबिरात आमदार अग्रवाल यांनी अर्जदारांच्या समस्या ऐकून घेत त्यांना त्वरित सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी २५० हून अधिक अर्जदारांना विविध योजनांसाठी अर्ज सादर करून माहिती घेतली. यात ७० उत्पन्नाचे दाखले, ४१ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, ३३ रेशनकार्ड, १३ मतदानकार्ड अर्ज होते. तर ३५ प्रमाणपत्र शासकीय चिकीत्सकांनी तयार करून दिले.